प्रतिनिधी/ सातारा
शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून लक्ष्मी टेकडीकडे पाहिले जाते. या झोपडपट्टीत अस्वच्छतेच्या प्रार्दुभावामुळे नागरिक आजारी पडत असल्याच्या वारंवार घडना घडत आहेत. त्यांची कोरोना टेस्ट केली तरीही ते निगेटीव्ह येतात. त्यांना अंगदुखी, कणकणी, पायाला सुज येणे असा आजार असून काहीं जण डेंग्यु चिकुनगुनियांची टेस्ट निगेटीव्ह आल्याचे सांगत असले तरीही जिल्हा हिवताप कार्यलयाकडून तेथे तोच आजार उदभवला असल्याचा दावा करत आहेत. नगरसेवक विशाल जाधव यांच्याकडून या परिसरात पालिकेच्या माध्यमातून धुर फवारणी व पावडर टाकून घेण्याचा कार्यक्रम करण्यात आला.
सदरबाजारमधील लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीत नियम मोडणारे अनेकजण आहेत. तर नियमाचे पालन करणारे हाताच्या बोटावर मोजण्याऐवढेच दिसतील. त्यामुळे सातत्याने येथे गैरसुविधा मिळत असल्याचे आरोप होतात. घरांच्याशेजारुनच नाले गेलेले असून घरातील कचरा त्या नाल्यातच टाकला जातो. तर झोपडपट्टीच्या मागे असलेल्या मोकळय़ा जागेतही कचरा टाकला जातो. त्यामुळे झोपडपट्टीच्या समोरील जरी झाडलोट केली तरीही पाठीमागे अस्वच्छता असल्याने डास उत्पन्न होण्याचे थांबत नाही. टाकीच्या खाली असलेल्या झोपडपट्टीत पाठीमागे अशीच साथ उदभवली होती. त्याच परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात असलेल्या झोपडपटयांमध्ये तीच अवस्था सध्या झाली आहे. येथील अस्वच्छतेमुळे या परिसरात सातत्याने कोणी ना कोणी आजारी पडत असते. त्याबाबत काहींनी वेगळाच आजार असल्याचे मीडियास सांगितले तर जिल्हा हिवताप कार्यालयाकडून तेथे जावून सर्व्हे केला होता. त्यामध्ये तेथेही अस्वच्छतेमुळे डास निर्माण झाल्याचे सांगण्यात आल्याने तेथील नागरिकांनाही डेंगी, चिकुनगुनिया सदृश्यच आजार झाला असल्याचा दावा केला आहे. पालिकेच्या कर्मचाऱयांकडून नगरसेवक विशाल जाधव यांनी औषध फवारणी करुन घेतली.