प्रतिनिधी /बेळगाव
भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलचा शहरातील सर्वात मोठा टॉवर आता हटविण्यात येत आहे. म्हणजेच डिसमेंटल करण्यात येत आहे.
1992-93 साली हा टॉवर बीएसएनएलच्या बेळगाव मुख्य कार्यालयाच्या आवारात उभा करण्यात आला होता. त्याकाळी 100 मीटर फूट उंचीचा हा शहरातील सर्वाधिक उंच टॉवर होता.
कालानुरुप ठराविक वर्षानंतर टॉवर हटविणे आवश्यक असते. त्यानुसार बीएसएनएलच्या ऑपरेशन समुद्रमंथन अंतर्गत हा टॉवर हटवण्यात येत आहे. मात्र हा टॉवर हटविल्याने बीएसएनएलच्या सेवेमध्ये कोणताही व्यत्यय निर्माण होणार नाही. कारण त्याच्यासमोर असलेल्या 60 मीटर उंचीच्या टॉवरवरून पूर्वीइतकीच सक्षमपणे सेवा दिली जाणार आहे.
गेल्या 20 वर्षांपासून या टॉवरवरूनच बीएसएनएलच्या सर्व सेवा दिल्या जात होत्या. जेंव्हा अन्य कोणत्याही मोबाईल कंपन्यांच्या सेवा उपलब्ध नव्हत्या, तेंव्हा या टॉवरचे महत्त्व विशेष होते. परंतु आता इतर अनेक कंपन्यांचे टॉवर शहरात उभे असल्याने इतक्मया मोठय़ा उंचीच्या टॉवरची गरज नाही, शिवाय मार्गदर्शक प्रणालीनुसार तो हटविणे भाग आहे, अशी माहिती बीएसएनएलचे सब-डिव्हिजन इंजिनियर पांडुरंग नायक यांनी तरुण भारतला दिली.