वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात सलग पाचव्या दिवशी देशभरात 11 हजार 502 रुग्ण वाढले. 15 दिवसांपूर्वी दररोज सव्वा लाख चाचण्या घेण्यात येत होत्या. आता ही संख्या सुमारे दीड लाख झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, तामिळनाडुमधील चार जिल्हय़ातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार व बुधवारी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सलग पाच दिवस दररोज नवे 11 हजार रुग्ण आढळत आहेत. सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये 11 हजार 502 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 33 हजार 363 झाली आहे. यातील 1 लाख 69 हजार 798 बरे झाले आहेत तर 1 लाख 53 हजार 106 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 9 हजार 520 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
तामिळनाडूतील चार जिल्हय़ांमधील लॉकडाऊन वाढवले
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार वाढत असल्याने तामिळनाडू सरकारने चार जिल्हय़ांमध्ये लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये चेन्नई, तिरूवल्लुवर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्हय़ांचा समावेश आहे. या जिल्हय़ांमध्ये 19 ते 30 जूनपर्यंत कडकडीत लॉकडाऊन असेल. केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत 8 लाख कामगार स्वगृही
कोरोना प्रादुर्भावामुळे परराज्यात अडकलेल्या कामगारांना स्वगृही पोहचविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ची सुविधा उपलब्ध केली होती. आतापर्यंत 4 हजार 450 ट्रेनमधून 8 लाखांहून अधिक कामगार स्वगृही पोहचले आहेत, असे रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
कामगार तुटवडय़ामुळे गुजरातमधील वस्त्राsद्योग पुन्हा बंद होणार
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील वस्त्राsद्योग पुन्हा बंद होणार आहे. सुरतमधील काही कंपन्या बंद ठेवण्यात येणार आहेत. कामगारांची संख्या कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.
दिल्ली सरकारला मिळणार 500 आयसोलेशन कोच
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिल्लीमध्ये 500 आयसोलेशन कोच उपलब्ध करून दिले आहेत. यातील पहिले 50 कोच हे शकूरबस्तीमध्ये देण्यात आले आहेत. तर 170 ते 180 कोच आनंद विहारमध्ये असतील, अन्य रेल्वे स्टेशनवर ठेवण्यात येतील, अशी माहिती उत्तर रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
पंतप्रधान मोदी साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार आणि बुधवारी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहेत. मंगळवारी दुपारी 21 राज्यांमधील मुख्यमंत्री, राज्यपाल आणि वरिष्ठ अधिकाऱयांची ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतील. यामध्ये पंजाब, केरळ, गोवा, उत्तराखंड, झारखंड, ईशान्यकडील राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. बुधवारी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधान चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.