भात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान
वार्ताहर /तुडये
पाच हत्तींचा कळप हजगोळी (ता. चंदगड) परिसरात दाखल झाल्याने शेतकऱयांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन मोठे हत्ती आणि तीन पिल्ले असा पाच हत्तींचा कळप हजगोळी ढेकोळी बुद्रुक व माडवळे टेकडी परिसरात दाखल झाला आहे. या परिसरातील भात पिकांचे या कळपाने मोठे नुकसान केले आहे. ऐन सुगीच्या हंगामातच हत्तींचा कळप दाखल झाल्याने शेतकऱयांकडून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हजगोळी गावाशेजारील बिऱहाड वस्ती परिसरातील भात पीक खाऊन व तुडवून नुकसान झाले आहे. ढेकोळी गावाच्या हद्दीतील पिकांचेही नुकसान झाले आहे. वनक्षेत्रपाल आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तुडयेचे वनपाल (फॉरेस्टर) नेताजी धामणकर व वन कर्मचाऱयांनी नुकसानीचे पंचनामे केले.
मंगळवारी सायंकाळी हा कळप माडवळे टेकडीवरील बारी परिसरातील घनदाट जंगलाकडे निघून गेला आहे. हजगोळी येथील जादा तर शेतकऱयांची शेती ही माडवळे टेकडी परिसरात असल्याने गव्याच्या कळपापासून पिकांचे रखवालीकरिता शेतकरी रात्री शेतात जागवतात. हत्तीच्या कळपाचे आगमन झाल्याने शेतकऱयांनी रखवालीस जाण्याचे बंद केले आहे. रात्रीच्यावेळी शेतकऱयांनी जंगली भागातील पिकांच्या रखवालीस जाण्याचे बंद केले आहे. रात्रीच्यावेळी शेतकऱयांनी जंगली भागातील पिकांच्या रखवालीकरिता जाणे टाळावे, पिकांचे नुकसानीचे पंचनामे त्वरित करत नुकसान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वनपाल नेताजी धामणकर यांनी सांगितले आहे.