बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने मंगळवारी दक्षिण पश्चिम मान्सून हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे १६ जिल्ह्यातील आणखी ४३ तालुके पूरग्रस्त म्हणून घोषित केले.
याआधी पूरग्रस्त म्हणून घोषित केलेले हे ४३ तालुके ऑगस्ट महिन्यात पूरग्रस्त म्हणून घोषित झालेल्या २३ जिल्ह्यांतील १३० तालुक्यांच्या यादीत समाविष्ट होतील.
राज्य सरकारच्या माहितीनुसार, संबंधित जिल्हा प्रशासनाच्या अहवालाच्या आधारे तालुका पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सप्टेंबरमध्येही मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पुरामुळे बरीच घरे, पिके आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.