प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्वमध्य अरबी समुद्रात 14 ते 16 मे रोजी वादळसदृश स्थिती निर्माण होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.
जिल्हय़ात 14 ते 15 मे दरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्मयता वर्तविली आहे. त्यामुळे सुमारे 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्मयताही आहे. त्याचप्रमाणे 16 मे रोजी महाराष्ट्र व गोवा किनाऱयावर 40, 45 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्मयता आहे. या कालावधीत सर्व मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून किनाऱयावरील गावांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार-रविवारी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
वादळामुळे मच्छीमार अलर्ट
मालवण : अरबी समुद्रात वादळसदृश स्थितीचा इशारा दिल्यामुळे मच्छीमारांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळपासून मच्छीमार नौका, जाळी आणि मासेमारीचे साहित्य सुरक्षितस्थळी नेत होते. तसेच किनारपट्टीवर पावसाचा इशारा दिला गेला असल्याने नौका छप्पर शाकारणीच्या कामांनाही वेग आला होता.
जिल्हय़ात बुधवारी सकाळपासूनच मच्छीमार अलर्ट झाल्याचे चित्र आहे. मालवण बंदरातील ट्रॉलर्स सुरक्षिततेसाठी देवगड बंदरात निघण्याची शक्मयता आहे. येत्या दोन दिवसांत वादळसदृश स्थितीचा परिणाम किनारपट्टीवर जाणवण्याची चिन्हे आहेत. दिवसभर काहीसे ढगाळ वातावरणही दिसून आले.