एसबीआयच्या अहवालातील माहिती
वृत्तसंस्था/ मुंबई
जगाच्या अर्थव्यवस्थेला धक्का दिलेल्या कोरोना विषाणू संसर्गाचा भारतीय अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊननंतर मोठे संख्येने वाढलेली बेरोजगारीमुळे भारतीयांच्या आर्थिक उत्पत्नात सरासरी 5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (जीडीपी) 3.8 टक्के इतकी घसरण झाली आहे, असे निरीक्षण भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नुकताच
प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात नोंदवले आहे.
‘एसबीआय’ने अहवालात म्हटले आहे की, देशातील नागरिकांचे आर्थिक उत्पन्न 1.52 लाख कोटी रूपये अपेक्षित होते. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे ते 1. 43 कोटी इतकेच झाले आहे. ‘जीडीपी’ पेक्षाही दरडोई उत्पर्त्नांतील घट मोठी आहे. या कालावधीमध्ये जागतिक स्तरावर दरडोई उत्पत्नाची घट ही 6.2 टक्के आहे. तर जीडीपीमधील घरसण 5.2 टक्के आहे.
देशातील आर्थिकदृष्टय़ा भक्कम असणाऱयांना राज्यांना दरडोई उत्पनाला सर्वाधिक फटका बसला आहे. दिल्ली, चंदीगड आणि गुजरातमधील दरडोई उत्पन्न हे अनुक्रमे 15.4, 13.9 आणि 11.6 टक्के घटले आहे. ही घसरण सरासरी उणे 5.4 टक्के एवढी आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडूमधील दरडोई उत्पन्न हे 10 ते 12 टक्क्यांनी घटले आहे. देशातील 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील दरडोई उत्पन्नामध्ये दोन अंकी घसरण झाली आहे. ही बाब चिंतेची आहे. कारण संबंधित राज्य व केंद्र शासित प्रदेशांचा सकल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा 47 टक्के आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे रेडझोनमधील शहरांमधील बाजारपेठांसह उद्योग ठप्प झाल्याने सर्वाधिक फटका बसला आहे. या कालावधीमध्ये 70 ते 80 टक्के ग्राहक कमी झाल्याचेही अहवालात स्पष्ट केले आहे.