प्रतिनिधी /पणजी
राज्य सरकारतर्फे मोठय़ाप्रमाणात नोकर भरती केली जात असतून त्यात मोठा घोटाळा असल्याचे काँग्रेसचे ऍल्वीस गोम्स यांनी सांगितले. राज्यातील विधान सभा निवडणूका जवळ आल्या असून मतदारांना भुलविण्यासाठी नोकरभरतीचे नाटक केले जात असून त्यातही घोटाळा करण्याचे भाजप सरकारने सोडलेले नाही असा असा आरोपही गोम्स यांनी केला आहे.
येथील काँग्रस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत नौशाद चौधरी व रॉयल आंद्रे उपस्थित होते. नोकर भरतीत घोटाळा म्हणजे राज्यातील युवकांचे जीवन बरबाद करण्यासारखे आहे. राज्यातील भाजप सरकार युवकांच्या भविष्यशी खेळत असल्याचा आरोप गोम्स यांनी केला आहे. सत्त्ाधारी पक्षातील उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरच सांगतात की आमदार पैसे घेऊन नोकऱया देतात आपण पैसे घेत नाही. आपण पैसे घेत नसल्याचे जरी कवळेकर सांगत असले तरी सत्तराधारी पक्षातील आमदार नोकऱया देण्यासाठी पैसे घेतात हे तरी मान्य करीत आहेत. म्हणजेच मोठय़ा प्रमाणात नोकर भरतीचा सपाटा भाजप सरकारने लावला आहे तो युवकांच्या भल्यासाठी नव्हे. येत्या निवडणूकांसाठी पैसे गोळा करण्याचा तो एक सोपा मार्ग असल्याचेही गोम्स म्हणाले आहे. सरकार गेली पाच वर्षे सत्तेत असताना आता शेवटचे काही महिने राहिले असताना नोकर भरती कशासाठी. पाच वर्षात कामगारांची उणीव भासली नाही काय असा प्रश्न गोम्स यांनी उपस्थित केला. 10 नोकऱया देण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले आहे. सरकारचे केवळ काही महिनेच बाकी राहिले असताना येवढय़ा वेळेत नोकर भरतीची प्रक्रीया पूर्ण होऊल का असा प्रश्न उपस्थित करून गोम्स म्हणाले की केवळ घोटाळा करण्यासाठी आणि मतदारांना भूलविण्यासाठीच हा सगळा प्रकार आहे. जनता अशा गोष्टींना भूलणार नसून भाजपाला त्यांची जागा दाखवून देणार असल्याचेही गोम्स यांनी सांगितले.