साहित्यः1 वाटी बासमती तांदूळ, 3 चमचे तूप, पाव वाटी काजू, 2 चमचे बेदाणे, मसालाः 5 वेलची, 4 लवंग, 2 तमालपत्र, अर्धा इंच दालचिनी तुकडा, अर्धा चमचा जिरं, 1 कांदा उभा चिरून, 4 लसूण पाकळय़ा चिरून, 2 चमचे आलं खिसून, दीड वाटी बोनलेस चिकन, 2 चमचे धणेपूड, 2 चमचे लाल तिखट पावडर, चवीपुरते मीठ, 1 चमचा गरम मसाला पावडर, पाव चमचा काळीमिरी, पाव चमचा लाल सुक्या मिरचीचे तुकडे, पाव चमचा शहाजिरं, पाव चमचा हळदपूड, 2 वाटी पाणी, अर्धी वाटी पुदिना चिरून, अर्धी वाटी कोथिंबीर चिरून
कृतीः तांदूळ अर्धा तास भिजत ठेवून निथळावेत. चिकन धुवून निथळावे. गरम तुपात काजू-बेदाणे परतवावेत. त्याच तुपात सर्व मसाला व कांदा परतवून घ्यावा. नंतर आलं-लसूण टाकावे. आता त्यात चिकन टाकून 6 ते 7 मिनिटे परतवावे. त्यातच मसाला पावडर आणि मीठ टाकून परतवावे. वरून निथळलेला तांदूळ आणि पाणी त्यात मिक्स करावे. वरून थोडीशी कोथिंबीर-पुदिना टाकावी. त्यावर झाकण ठेवावे. मिश्रण 10 ते 15 मिनिटे मध्यम आचेवर ठेवावे. नंतर आच मंद करून 5 ते 7 मिनिटे ठेवावे. आता तयार बिर्याणीवर उरलेली पुदिना-कोथिंबीर टाकावी. त्यावर काजू-बेदाणे टाकावेत. तयार बिर्याणी खाण्यास द्या.