मंत्री मायकल लोबो यांची माहिती : अन्यथा राज्यात येण्यास पर्यटकांना बंदी घालावी
प्रतिनिधी /म्हापसा
महाराष्ट्र राज्यात जी संचारबंदी सुरू होती ती सरकारने उठविली आहे. राज्यात संचारबंदी वाढविण्यात आली आहे. हळूहळू पर्यटक राज्यात येऊ लागले आहे. बहुतेक हॉटेल्स रेस्टॉरंट बंद आहेत व फक्त टेक अव्हे सुरू आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना त्रास झाले आहे. यामुळे पर्यटन व्यवसाय इंडस्ट्रीला त्रास झालेला आहे. जे पर्यटक राज्यात विमानसेवा, रेल्वे वा रोडने येणार त्यांनी दोन्ही इंजेक्शन घेऊन येणे सक्तीचे आहे. वा आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करावी याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणी करणार असल्याची माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अन्यथा त्यांना प्रवेश देऊ नये असे मंत्री लोबो म्हणाले.
ते म्हणाले की, आता काही दिवसात पर्यटन महोत्सव राज्यात सुरू होणार आहे. कोरोनाची दोन्ही इंजेक्शन मारणे आवश्यक आहे. ज्यांनी कुणी घेतली नाही त्यांनी आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र दाखविणे गरजेचे आहे. याबाबत पोलिसांनी कडक पालन करण्याचे आवश्यक असल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दिली. दर दिवशी कोविड मृत्यू सुरू आहे. त्यादिवशी सर्व आमदार पर्यटन महोत्सवाबाबत एकत्रित येऊन निर्णय घेणार त्यावेळी या दोन गोष्टी आवश्यक आहे असे लोबो म्हणाले. ऑगस्ट 1 पासून पर्यटकांना घेण्याचे राज्यात ठरविले तर या दोन गोष्टी नसल्यास त्यांना राज्यात प्रवेश देऊ नये. धंदा, व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे. काही पर्यटक राज्यात येत असले तरी विमानतळावर या दोन गोष्टी मागत आहेत. हे सुरू राहणे गरजेचे आहे. रेल्वेत तपासणी होत नाही तर त्याबाबत आम्ही विचार करू व याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल. रेल्वेतही याबाबत कडक चौकशी केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.