कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूरचा स्वाभिमानी नागरिक, स्वाभिमानी खेळाडू भाजपच्या मताला बळी पडणार नाही. भाजकडून जाती-जातीमध्ये तेड करण्याचे काम सुरू आहे. मात्र कोल्हापुरात हे चालणार नाही. कोल्हापूरचा स्वाभिमान कोण डिवचण्याचा कोण प्रयत्न करत असेल? तर चालणार नाही. असा इशारा माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी दिला. कोल्हापूर महाविकास आघाडी जाहीर सभा मिरजकर तिकटी येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
मालोजीराजे पुढे म्हणाले, अण्णांच्या जाण्याने कोल्हापूर उत्तरमध्ये पोट निवडणूक लागली. अशा वेळी ही निवडणूक लागायला नको होती. अण्णांची प्रश्न सोडवण्याबाबत जी तळमळ होती ती आता खूप कमी नेत्यांमध्ये दिसते. त्यामुळे अण्णांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी जयश्री ताईंना मतं दिली पाहिजे. असे मालोजीराजे छत्रपती म्हणाले.
भाजपने विकासावर बोलायला पाहिजे होते. पण ते सोशल मीडियावरून टीका करत सुटले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्यावरून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. या ताराराणींच्या नगरीतून एक ताराराणींच विधानसभेत गेल्या पाहिजेत. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे, कोणत्याही भूलथापांना ती बळी पडणार नाहीत. असेही मालोजीराजे म्हणाले.