प्रतिनिधी / बेळगाव : गेल्या ७० वर्षांपेक्षाही अधिक वर्ष आम्ही जमीन कसत आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असून वन विभागातील ती जमीन सक्रम करून द्यावी अशी मागणी के. एम नांगनूर ग्रामस्थांनी केली आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. एकूण १२० एकर जमीन ३२ कुटुंबाकडे आहेत. त्या सर्व जमिनी त्यांच्या नावे कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बसवाणी कांबळे, भैरू कांबळे, गणपती कांबळे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.