विवाहप्रमाणपत्र बनावट मानले जाणार : मद्रास उच्च न्यायालय
वृत्तसंस्था /चेन्नई
विवाह सोहळय़ापूर्वी विवाहाच्या नोंदणीला मद्रास उच्च न्यायालयाने अमान्य ठरविले आहे. विवाह सोहळय़ाशिवाय कुठल्याही विवाह नोंदणीला बनावटच मानले जाणार आहे. विवाह खरोखरच झाला आहे की नाही याची चौकशी करणे हे संबंधित अधिकाऱयाचे कर्तव्य आहे. कुठल्याही विवाहसोहळय़ाशिवाय विवाहाची नोंदणी केल्याने जोडप्याला विवाहित म्हटले जाऊ शकत नसल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने केली आहे.
एका महिलेला धमकावून विवाह नेंदणी अर्जावर स्वाक्षरी करवून घेतल्याच्या घटनेप्रकरणी न्यायाधीश आर. विजयकुमार यांनी संबंधित विवाह प्रमाणपत्र रद्द ठरविले आहे. विवाहसोहळय़ाची खातरजमा केल्याशिवाय नोंदणी अधिकारी कुठल्याही बाजूकडून सादर अर्जाच्या आधारावर विवाहाची नोंदणी करू शकत नाही. कुठल्याही विवाह सोहळय़ाशिवाय विवाह प्रमाणपत्र जारी करण्यात आल्यास ते बनावट मानले जाणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
जोडप्याने खरोखरच विवाहसोहळय़ात भाग घेतला आहे की नाही याची खातरजमा संबंधित नोंदणी अधिकाऱयाने करणे आवश्यक आहे. तामिळनाडू विवाह नोंदणीकरण अधिनियम, 2009 च्या तरतुदी आणि याच्या अंतर्गत असलेले नियम हे संबंधित धर्मानुसार विवाहाच्या सोहळय़ांमध्ये जोडप्याला सामील होणे अनिवार्य असल्याचे दर्शवितात असे न्यायालयाने नमूद केले आहे.
एका मुस्लीम महिलेकडून स्वतःच्या विवाहाची नोंदणी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. चुलत भावाने आपली आई आजारी असून मला महाविद्यालयातून घराऐवजी एका उपनोंदणी कार्यालयात नेले होते. तेथे विवाहाच्या रजिस्टरवर धमकावून स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आल्याचे महिलेने याचिकेत म्हटले हेते.