रोजगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडून कामगार आयुक्तांना सब्ंांधितांना पत्र पाठविण्याचे निर्देश
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील खासगी कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेल्या रिक्त जागांच्या नोकरभरतीची जाहिरात करावी, असे पत्र त्यांना पाठविण्याचे निर्देश रोजगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी कामगार आयुक्तांना दिले आहेत. सरकारी नोकऱयांची जाहिरात केली जाते व त्यासाठी सर्व इच्छुकांना अर्ज करण्याची संधी मिळते. तशी संधी खासगी क्षेत्रात मिळत नाही. म्हणून ते करण्याची गरज आहे, असेही मोन्सेरात म्हणाले.
त्यांनी सांगितले की खासगी क्षेत्रातील नोकऱयांची माहितीच मिळत नाही. तेथे गोमंतकीय बेकारांना संधी मिळाली पाहिजे, परंतु ती वस्तूस्थिती आहे. सरकारी क्षेत्रात सर्वांना नोकरी मिळतेच असे नाही. आणि ते अशक्य आहे, परंतु खासगी क्षेत्रात तरी गोमंतकीयांना नोकरी मिळाली पाहिजे. यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मंत्री मोन्सेरात यांनी दिली आहे. गोव्यातील खासगी उद्योगात परप्रांतियांची संख्या जास्त असून जाहिराती न करता गोमंतकीयांना डावलून इतरांना नोकऱया दिल्या जास असल्याचे समोर आले आहे, असे ते म्हणाले.
रोजंदारी वेतनातही वाढ करणार!
खासगी क्षेत्रातही रोजगारासाठी प्रत्येकाला अर्ज करण्याचा अधिकार आहे. व तो मिळाला पाहिजे. कंपनीने मग गुणवत्तेनुसार उमेदवार निवडावेत. रोजंदारी वेतनातही वाढ करण्यात येणार आहे. कामगार खात्याने वरील हेतू बाळगून काम करावे, असेही त्यांनी बजावले आहे.