वाळपई प्रतिनिधी
शेळ मेळावली या ठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या आयआयटी प्रकल्पाच्या संदर्भात सरकार हारलेले आहे. यामुळे गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सदर भागांमध्ये येऊन नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकारला जर खरोखरच आमच्या जमीन नावावर करून द्यायच्या होत्या तर यापूर्वी का आले नाहीत अशाप्रकारचा सवाल या भागातील या प्रकल्पाला विरोध करणाऱया महिला भगिनी केला आहे .या संदर्भाचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल करण्यात आला.
यामध्ये सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गुरुवारी शेळ मेळावली या ठिकाणी जल्मी देवस्थानात आयोजित केलेल्या बैठकांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारची सुविधा निर्माण करून या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना व भागाला विकास करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येतील. अशा प्रकारचे आश्वासन दिले होते .त्याचप्रमाणे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत याने आयआयटी प्रकल्पाच्या संपादित जमिनीमध्ये फेरफटका मारून यासंदर्भाची पाहणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे गेल्यानंतर या महिलांनी एक चित्रफीत जारी केलेली आहे .या चित्रफितीमध्ये सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे .
दरम्यान याप्रकल्पाच्या सभोवताली कंपाउंड व एकूण प्रकल्पाच्या भूमापन प्रक्रियेला आज पुन्हा सुरू होण्याची कुणकुण असल्यामुळे पुन्हा एकदा महिला व नागरिक रस्त्यावर उतरले. सकाळापासून दुपारपर्यंत प्रमुख रस्त्यावर बसून या कामाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न या महिलांनी केला होता. मात्र भुमापन करणारे पथक सदर भागांमध्ये न गेल्यामुळे दुपारी सदर आंदोलन मागे घेण्यात आले.
जोपर्यंत सरकार हा आयआयटी प्रकल्प रद्दबादल करत नाही. तोपर्यंत याभागातील जनता रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला विरोध करणार असल्याचे निकिता नाईक व
या भागातील स्थानिकांनी केलेला आहे. दरम्यान जारी केलेल्या एका चित्रफीत त्याच्या माध्यमातून महिला भगिनी यापूर्वी अनेकवेळा या जमिनी आमच्या नावावर करण्याची विनंती सरकारला केली होती. मात्र त्या संदर्भातील कोणत्याही प्रकारची पर्वा न करता सरकारने याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले व आता सदर जमीन आपल्या मालकीची असल्याचा बहाणा करून सरकार आमच्या शेती-बागायती काजू बागायती याच्यावर कब्जा करून हा प्रकल्प आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे .
मुख्यमंत्री डोक्मयात प्रमोद सावंत यांनी याभागामध्ये येऊन सदर जमिनी मध्ये बऱयाच प्रमाणात काजू असल्याचे मान्य केले आहे .
म्हणजे या भागातील जनता व या भागातील पूर्वजांनी याठिकाणी काजू बागायती निर्माण करून आपला उदरनिर्वाह निर्माण केला होता. हे सरकारला मान्यच करावे लागेल असे असताना या बागायतीवर नांगर फिरवून याभागातील उदरनिर्वाहाचे साधन हिसकावून घेण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना खरोखरच या भागातील जनतेचा कळवळा असेल तर त्यांनी आयटी प्रकल्प रद्द करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे.
आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसून या भागातील नागरिकांची एकजूट आजही कायम असल्याचे सदर चित्रफितीच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे.
आतापर्यंत या भागाच्या विकासासाठी सर्वच राजकारण्यानी दुर्लक्ष केलेले आहे. या भागातील जमिनीच्या प्रश्नावर सत्तरी तालुक्मयातील जमिनीचा प्रश्न आजही प्रलंबित झालेला आहे. या भागातून राजकारण करणाऱया राजकीय मंडळींनी आपल्या स्वार्थासाठी हा विषय मुद्दामपणे प्रलंबित ठेवलेले आहे. आता आयटी प्रकल्पाच्या माध्यमातून खऱया अर्थाने जमीन मालकीचा प्रश्नासंदर्भात गांभीर्य निर्माण झालेले आहे .सरकारला व या भागाच्या राजकारण्यांना जर खरोखरच जनतेच्या समस्यांचा कळवळा असेल तर त्यांनी जमीन मालकीचा प्रश्न धसास लावणे अत्यंत गरजेचे आहे.त्याचप्रमाणे या भागातील जनतेने मोठय़ा प्रमाणात केलेल्या काजू बागायतीच्या जमिनी त्यांच्या नावावर करून द्या अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे .या प्रकल्पाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्रखर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार हरलेले आहे .यामुळेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या भागांमध्ये येऊन जनतेची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे .मात्र त्यांनी आयटी प्रकल्प रद्दबादल करावा नंतर या भागामध्ये यावे अशा प्रकारचे जाहीर आव्हान सदर चित्रफितीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.