तहसिलदार राजाराम म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती
ओटवणे प्रतिनिधी
शासनाच्या ई पीक पाहणी व नोंदणीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती बाबत गुरुवारी दाणोलीत प्रभात फेरी काढण्यात आली. सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीत श्री म्हात्रे यांनी ई पीक पाहणीचे महत्त्व सांगून याचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
यावेळी आंबोली मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव, दाणोली तलाठी सचिन चितारी, बावळाट सरपंच दिनानाथ कशाळीकर, केसरी सरपंच देवेंद्र सावंत, देवसू सरपंचा संजना सावंत, दाणोली हायस्कूलचे मुख्याध्यापक जयवंत पाटील, कोतवाल काशिराम जाधव, सचिन पारधी, तसेच केसरी, देवसु, बावळाट, सातुळी गावचे कोतवाल, ग्रामसेवक, पोलिस पाटील तसेच शेतकरी, दाणोली हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.