प्रतिनिधी / कराड
कराड येथील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व पर्यावरण मित्र नाना खामकर ह्यांची केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन, व जलवायु परिवर्तन मंत्रालया अंतर्गत वन्यजीव अपराध नियंत्रण समितीवर सदस्य पदी नेमणूक झाली आहे. वन्यजीव तसेच वन्यजीव अवयवांची वाढती तस्करी व हत्या ह्याला आळा बसावा ह्यासाठी ही समिती कार्य करते.
पश्चीम घाट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वन्यजीवांची अवैधरित्या शिकार होते तसेच कासव, मांडूळ,सर्प,सर्प विष, खवले मांजर, नख्या, वन्यजी दात,कातडे इत्यादींची अवैध तस्करी होत असते, ह्याला चाप बसावा ह्यासाठी स्थानिक वन्यजीव प्रेमींची मदत घेण्याचे भारत सरकारचे धोरण असून त्यानुसार ह्या क्षेत्रात काम करणारे स्वयंसेवी कार्यकर्ते रोहन भाटे व नाना खामकर ह्यांची निवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्हात खऱ्या खोट्या वाघ्नख्यांचे ‘लॉकेट’ करून घालण्याची पद्धत रूढ होत आहे, तसेच घरात जिवंत कासव पाळण्याचे प्रमाण वाढते आहे. वन्यजीवांचे कातडे, शिंग हे शोभेच्या वस्तू म्हणून वापरल्या जात आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारेही वन्यजीवांच्या अवयवांचा वापर करताना दिसत आहेत.
स्थानिक वनविभाग , वन्यजीव विभाग, पोलीस यंत्रणा व स्थानिक नागरिकांच्या मदतीने ह्या अवैध कृत्यांचा प्रतिबंध करण्यासाठी व जनजागरण करण्याचे म्हत्वाचे काम ह्या समितीला करावे लागणार आहे .२०१६ पासून भाटे व खामकर हे ह्या समितीवर प्रभावीपणे कार्यरत आहेत. पुन्हा एखदा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरो वर सदस्य म्हणून पुन्हा मार्च 2022 पर्यंत त्यांना निवडले गेले आहे.
देशातील वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी आपला सक्रिय सहभाग आणि योगदाना लक्षात घेऊन विशेषत: सार्वजनिक संवेदनशीलता, जनजागरण आणि वन्यजीवांच्या अवैध वाहतुकी विषयी तसेच वन्यजीव यांचे शरीराचे भाग तस्करी व त्याविषयी माहिती संकलन करणे व अपराधी पकडणे हे यांनी प्रभावीपणे केले आहे . तुम्हाला पुढील दोन वर्षांसाठी वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरो वर सदस्य म्हणून पुन्हा मार्च 2022 पर्यंत निवडले गेले आहे.
तिलोत्मा वर्मा – अतिरिक्त संचालक वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो, भारत सरकार