वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेच्या दरम्यान मोठय़ा प्रमाणात ग्राहकोपयोगी वस्तु क्षेत्राने (एफएमसीजी) मजबूत कामगिरी केली आहे. यामध्ये दुकानदारांच्या साठय़ामध्ये कमीच स्टॉक राहिला होता. अनेक दुकाने बंद असल्याच्या काळात ऑनलाइन व्यवहारांनी या क्षेत्राला दिलासा दिला.
एप्रिल ते जून 2021 या कालावधीच्या दरम्यान वर्षाच्या आधारे एफएमसीजी क्षेत्राने 36.9 टक्क्यांची तेजी प्राप्त केली आहे. परंतु हा वाढीचा आकडा मार्च तिमाहीच्या तुलनेत 2 टक्क्यांनी कमीच राहिला आहे, अशी माहिती नीलसन आयक्यूच्या एका अहवालामधून देण्यात आली आहे.
बंदच्या कालावधीत दुसऱया लॉकडाऊनच्या अगोदरच्या तुलनेत थोडीशी समाधानकारक कामगिरी एफएमसीजी क्षेत्राने करत पुरवठय़ावर अधिक भर दिला होता.
लहान व मोठय़ा शहरांवर प्रभाव
प्राप्त अहवालानुसार ग्रामीण व शहरी भागातील क्षेत्रावर अधिकचा प्रभाव दिसून आला नाही. देशातील पहिल्या 52 शहरांमध्ये महामारीचे एफएमसीजी क्षेत्रावर मोठय़ा प्रमाणात नकारात्मक वातावरण राहिले होते. तसेच ग्रामीण भागातील क्षेत्रात एफएमसीजी क्षेत्राकडून मागणी कायम राहिल्याने ही वाढ दिसल्याचे सांगितले जाते.