प्रतिनिधी /बेळगाव
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करून एपीएमसी भाजी मार्केट विविध ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. ऑटोनगर कणबर्गी परिसरातील आरटीओ मैदानावर भाजी मार्केट सुरू करण्यात आले होते. पण सदर मार्केट बंद करण्यात आल्यानंतर परिसराची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आरटीओ मैदानावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
एपीएमसी भाजी मार्केटमध्ये सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले होते. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने एपीएमसीमधील भाजी मार्केट शहरातील विविध भागात तीन ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. सामाजिक अंतर राखण्याबरोबर गर्दी टाळण्यासाठी मैदानावर एपीएमसी भाजी मार्केट सुरू करण्यात आले होते. ऑटोनगर, हिंडाल्को मैदान आणि सीपीएड मैदानावर भाजी मार्केट सुरू करण्यात आली होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनलॉक करण्यात आले आहे. त्यामुळे भाजी मार्केट पुन्हा एपीएमसीमध्ये सुरू करण्यात आले आहे. विविध ठिकाणी सुरू करण्यात आलेले भाजी मार्केट बंद करण्यात आले. पण मैदानांची स्वच्छता करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ऑटोनगर परिसरातील आरटीओ मैदानावरील भाजी मार्केट हटविल्यानंतर येथील स्वच्छता करण्यात आली नाही. परिणामी या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मैदानाचा वापर वाहनांची तपासणी करण्यासाठी तसेच वाहनचालक परवाना चाचणी अशा विविध कारणांकरिता होत असतो. त्यामुळे दररोज येणाऱया नागरिकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. पण येथील स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष केल्याने भाजीची रिकामी पोती व कचरा मैदानात पसरला आहे. परिणामी दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. परिसराची स्वच्छता करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.