प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी रत्नागिरी पालिकेकडून कसून प्रयत्न सुरू आहेत. कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची सोय केलेली असताना ही गाडी गेल्यावर आजही अनेकजण मोकळय़ा जागेवर कचरा फेकतात. त्यांना चाप घालण्यासाठी शहरात 12 ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे ‘वॉच’ ठेवला जाणार आहे.
हा महत्वपूर्ण निर्णय रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यासाठी शहरातील मोठय़ा प्रमाणात कचरा जमा होणाऱया जागांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 12 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पऱयाची आळी, पटवर्धन हायस्कूलकडे जाणारी गल्लीतील छाया लॉजसमोरची जागा, झारणी रोड, आठवडा बाजार शौचालयामागे, मिरकरवाडा पोलीस चौकी, नवीन भाजी मार्केट, कोकणनगर स्वामी समर्थ बंगल्यासमोर, मजगाव रोडवरील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामागील भाजी मार्केटसमोर, कोकणनगर कदमवाडीसमोर, मारुती मंदिर मच्छीमार्केटमध्ये, झारणी रोड मच्छीमार्केट अशा ठिकाणी पॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
त्याठिकाणी नागरिक मोठय़ा प्रमाणात कचरा आणून टाकत असतात. कचऱयामुळे तेथील परिसराला बकाल स्वरूप येत आहे. याठिकाणी न.प.ची कचरा गाडी कचरा उचलून गेल्यानंतरही नागरिक बेफिकीरपणे पुन्हा कचरा अस्ताव्यस्त फेकून देतात. त्यासाठी अशा नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी हे सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याचे न.प.आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. त्याबाबतची निविदा प्रक्रिया न.प.प्रशासनस्तरावरून सुरू झाली आहे.