सावंतवाडी /प्रतिनिधी-
कलंबिस्त येथील तलाठी सुमित घाडीगावकर हे सर्वसामान्य गोरगरिबांसाठी चांगली सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांची बदली करू नये अशी मागणी कलंबिस्त पंचक्रोशीतील शेतकरी, गोरगरीब ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कलंबिस्त शिर्शिंगे या गावासाठी गेल्या वर्षभरापूर्वी सुमित घाडीगावकर हे तलाठी म्हणून रुजू झाले. ते या पंचक्रोशीत सर्वसामान्य गोरगरिबांसाठी चांगली सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांची बदली करू नये. जर बदली झाल्यास आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊ असे सामाजिक कार्यकर्ते बाबा पास्ते, शाहू पास्ते, दिलीप राऊळ, भाई देसाई आदी ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन यावेळी देण्यात आले.
कलंबिस्त पंचक्रोशीत श्री घाडीगावकर हे तलाठी म्हणून रुजू झाल्यापासून चांगली सेवा देत आहेत. असे असताना त्यांची सेवा खंडित करून त्यांची येथून बदली करण्याचा घाट घालण्यात येत आहे. त्यामुळे अशा चांगल्या व्यक्तीची बदली झाल्यास सर्वसामान्य गोरगरिबांची चांगली सेवा खंडित होणार आहे त्यामुळे त्यांची बदली करू नये असे निवेदन दिले आहे.