लॉकडाऊनचा फटका शेतकऱयांनाही
प्रतिनिधी / बेळगाव
कांद्याची आवक मर्यादीतच. मात्र लहान मोठे आठवडी बाजार बंद असल्यामुळे तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरेंट पूर्णपणे लॉकडाऊन ठेवल्यामुळे कांद्याची मागणी घटली आहे. त्या कारणामुळेच कांद्याचा दर कमी झाला आहे. सध्या तांबडा, पांढरा कांद्याचा दर सरासरी 600 ते 1200 रुपयांपर्यंत आहे. कोरोनाचा फटका आता शेतकऱयांनाही बसताना दिसू लागला आहे. हे चित्र एपीएमसीच्या आवक व खरेदीदारांवरुन पहायला मिळू लागले आहे.
काहीवेळा कांद्याने शंभरी गाठली होती. त्यामुळे ग्राहकाच्या डोळय़ात पाणी आले होते. मात्र आता कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकऱयाच्या डोळय़ात कांद्याने पाणी आणले आहे. एक तर कोरोनामुळे घातलेले निर्बंध आणि पसरलेली आर्थिक मंदी यामुळे सर्वच घटकांना फटका बसू लागला आहे. कांदा हा नाशवंत माल आहे. त्यामुळे त्याची खरेदी आणि विक्री वेळेत होणे गरजेचे आहे. त्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी कांदा काढल्याबरोबरच बाजाराला आणतो. मात्र अशा दर गडगडण्यामुळे त्या शेतकऱयांना आर्थिक फटका बसू लागला आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक काही प्रमाणात वाढली तरी तो कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल नाही. त्यामुळे कांद्याचे दर कमी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे स्थानिक बाजारपेठा बंद आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील खरेदीदार बाजारपेठेकडे वळताना दिसत नाहीत. बागेवाडी, शहापूर, बैलहोंगल, बेळगाव, खानापूर यासह इतर ग्रामीण तालुक्मयांतही लॉकडाऊन असल्यामुळे कांद्याची विक्री होत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत कांदा पडूनच आहे. याचा परिणाम दरावर झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
बेळगावमध्ये विशेष करुन हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये कांद्याची मागणी आहे. मात्र लॉकडाऊन काळात सर्वच व्यवहार बंद असल्यामुळे याचा फटकाही दरावर झाल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आवक आहे. मात्र विक्री होत नसल्याने कांद्याचे दर गडगडले आहेत. लॉकडाऊन कमी झाल्यानंतरच कांद्याचे दर वाढण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. याचबरोबर हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरु झाल्यास कांद्याला मागणी वाढणार आहे. मात्र सध्या बळीराजा मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे.