वाई नगरपरिषद कर्मचारी यांचा उपक्रम
प्रतिनिधी/ वाई
वाई शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय आणि इतर गरजू व गरीब लोक अडकलेले
आहेत आणि काम नसल्यामुळे ज्यांच्या दैनंदिन जेवणाची गैरसोय होती आहे अशा लोकांसाठी 3
कम्युनिटी किचनद्वारे जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. शहरातील जवळपास 1000 लोकांची
भूक यामार्फत दररोज भागवली जात आहे. सदरचे कम्युनिटी किचन्स हे 3 वेगवेगळ्या सामाजिक
संस्थांमार्फत चालविले जात असून त्यांना धान्य व आर्थिक स्वरूपात समाजातील अनेक दानशूर
व्यक्ती मदत करत आहेत. या कामातील आपला सहभाग नोंदविण्यासाठी बाई नगपरिषदेच्या
मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, कार्यालय अधीक्षक श्री. नारायण गोसावी, सर्व विभाग प्रमुख, इतर सर्व
कर्मचारी, ठेकेदार-शशिकांत यादव, अविनाश रांजणे, राहुल जायगुडे, युगल घाडगे यांनी आपली सामाजिक
बांधिलकी जोपासत जवळपास 1 महिन्याचा शिधा यामधील जैन सोशल ग्रुप, वाई या संस्थेस आज
दिनांक 1 मे 2020 रोजी सुपूर्द केला आहे.
जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्री. दिपक ओसवाल आणि खजिनदार श्री. भरत गांधी यांनी
नगपरिषदेमार्फत दिलेले साहित्य स्वीकारले असून याप्रसंगी बोलताना ओसवाल यांनी बाई नगरपरिषद
कर्मचारी व ठेकेदार यांचे आभार मानले. नगरपरिषदेच्या सर्व सेवा अत्यावश्यक असून त्या आज
अखेर सुरळीतपणे चालू आहेत, याचे कारण नगरपरिषद कर्मचारी चोखपणे बजावत आहेत. तसेच
प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि नियोजनामुळे आजही आपले शहर कोरोनामुक्त आहे. या सर्व
पार्श्वभूमीवर नगरपरिषद कर्मचारी आणि प्रशासनाने जपलेली सामाजिक बांधिलकी ही अभिमानास्पद
आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
वाई मधील अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते नगरपरिषद प्रशासनास वेळोवेळी सहकार्य
करत आहेत. त्यामुळेच प्रशासनाला चांगले काम करणे शक्य होत आहे असे मत मुख्याधिकारी यांनी
व्यक्त केले आहे. समाजातील विविध घटकांना मदतीचे आवाहन करण्यापूर्वी आपण आपली
जबाबदारी पार पाडली पाहिजे या भावनेतून नगरपरिषद कर्मचारी यांनी हा उपक्रम राबविलेला आहे.
सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये रोजंदारी करणान्या आणि परप्रांतीय लोकांची बेरोजगारीमुळे
अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. त्यांच्या अन्नधान्याची सोय व्यवस्थित करणे ही आपल्या
सर्वाचीच जबाबदारी आहे आणि ती आता व्यवस्थितरीत्या पार पाडली जात आहे. येणाया काळातील
संभाव्य आव्हान लक्षात घेता ही सोय आणखी काही काळ करणे गरजेचे आहे. यासाठी इथून पुढे या
संस्थांना मदतीचा ओघ असाच चालू राहणे आवश्यक आहे. तरी अशाप्रकारे मदत करू इच्छिणान्यांना
अन्नधान्याच्या स्वरूपात या संस्थांना नगरपरिषदेच्या माध्यमातून मदत करावी असे आवाहन
मुख्याधिकारी यांनी केलेली आहे.