केंद्र सरकारचा आदेश, त्वरित क्रियान्वयन होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे 10,000 सुरक्ष रक्षक जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातून त्वरीत मागे घेण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. त्यांना गेल्यावर्षी अनुच्छेद 370 निष्प्रभ केल्यानंतर तेथे नियुक्त करण्यात आले होते. या सुरक्षा रक्षकांना विश्रांती घेऊन पुन्हा सज्ज होण्यासाठी तसेच प्रशिक्षणासाठी मागे घेण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे.
एकाच वेळी या दलाच्या 10 हजार रक्षकांना मागे घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे दल केंद्रीय गृहविभागाच्या अधिकारात काम करते. या दलात केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दल यांचा समावेश होता. बुधवारच्या निर्णयानुसार केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40, तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 20 आणि सीमा सुरक्षा दलाच्या 20 तुकडय़ा काश्मीरातून हटविण्यात येणार आहेत.
काश्मीरमध्ये पुरेसे सैनिकबळ
घुसखोरी आणि दहशतवाद विरोधी कारवाई करणाऱया अनेक सैनिक तुकडय़ा सध्या काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. काढून घेण्यात येणारी दले तेथे अतिरिक्त स्वरूपात नियुक्त करण्यात आली होती. आता त्यांची तेथे आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांना विश्रांती देऊन अधिक प्रशिक्षण देण्यात येईल. नंतर आवश्यकतेनुसार त्यांची अन्यत्र नियुक्ती करण्यात येईल, असे स्पष्ट पेले गेले.