अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार दि 8 मे सकाळी 9.00
घरीच डॉक्टरच्या सल्ल्याने औषधे घेऊन कोरोनावर मात
● 22 एप्रिलपर्यंत होतो पूर्णपणे क्वारंटाईन ● वृद्ध आई आणि पत्नीने मात केल्याचे मुकेश नगरकर यांनी सांगितले ● आपलं घर सुरक्षित तर आपण सुरक्षित
प्रतिनिधी / सातारा :
कोरोना महामारी दिवसेंदिवस वाढत असल्याच मी ऐकत होतो. मात्र, माझा जेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा काहीसा घाबरलो होतो. पण मित्रांनी आणि कुटूंबियांनी आधार दिल्याने खचून न जाता कोरोनाच्या दैत्याला हरवू शकलो. मला कसा कुठे कोरोनाचा स्पर्श झाला हे समजले नाही.पण आपण सुरक्षित आपलं घर सुरक्षित तर सगळेच सुरक्षित राहू मला पटले. माझ्यासह माझी आई, माझी पत्नी आणि मी असे तिघांनी कोरोनावर मात केली ती घरच्या घरी डॉक्टर सांगतील ते औषधे घेऊन खडखडीत बरा झालो. लोकांनी ही स्वतःची आणि स्वतःच्या कुटूंबाची काळजी घ्यावी, कोरोनाला हरवायला सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत, असे प्रतापगंज पेठेतील ओंकार ज्वेलर्सचे मुकेश नगरकर यांनी आवाहन केले.
प्रतापगंज पेठेतल्या ओंकार ज्वेलर्सचे मुकेश नगरकर यांनी आपल्या व्यवसायात अनेकजण येत असल्याने तसेच बँकेत कामानिमित्त येणे-जाणे असल्याने कोरोना कसा कधी कुठ होईल हे सांगता येत नाही. नगरकर हे आपला व्यवसाय करत असताना सर्व काळजी घेत होते, पण दि. 28 मार्च रोजी त्यांना सर्दी आणि अंग दुःखी जाणवली. त्याच दिवशी त्यांनी समर्थ मंदिर येथील पालेकर यांच्या दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी तपासणी करून नगरकर यांना गोळ्या दिल्या. त्यांच्या गोळ्या खाल्ल्या तरी कमी येत नव्हते म्हणून पुन्हा डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी दिलेल्या सल्यानुसार औषध घेत होते, पण ताप कमी होत नव्हता म्हणून त्यांनी कोरोना टेस्ट करण्यास सांगितले.
दि. 2 रोजी प्रतापगंज पेठेत उत्कर्ष लॅबमध्ये कोरोना टेस्ट केली. पॉझिटिव्ह रिपोर्ट आला अन काळजात धस्स झालं. पण मित्रांनी आधार दिला. त्यातच नगरकर यांची मैत्रीण ज्या डॉक्टरकडे बरी झाली होती, त्या डॉक्टरकडे गेले पण काही फरक पडेना म्हणून त्यांना नगरसेवक अविनाश कदम यांनी फोन करून नाक्यावरच्या डॉ. संग्राम देशमुख यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. ते तेथे गेले डॉ. संग्राम देशमुख यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषध उपचार सुरू ठेवले.
नगरकर यांना घरातच उपचार घेण्यासाठी सांगितले. दिलेल्या गोळ्या वेळेवर घेत स्वतः एका खोलीत रहात होते. आपल्या कुटूंबातील इतर कोणाला कोरोनाची बाधा होऊ नये, याची काळजी घेत होते. पण त्यांच्या 73 वर्षाच्या आईला त्रास जाणवू लागला. त्यामुळे दोन्ही मुले आणि त्यांची पत्नी मानसी, आई शारदा यांना कस्तुरबामध्ये टेस्ट केली. दि. 10 एप्रिलला त्यात आई आणि पत्नी दोघे पॉझिटिव्ह आले. तिघांना डॉ. देशमुख यांच्या सल्ल्यानुसार औषध सुरू होती. दोन्ही मुले वेगळी तर घरात पाच माणस स्वतःची काळजी घेत होते. बाहेरून डबे मागवत होते.
याबाबत नगरकर म्हणाले, खाण्यापिण्यात हयगय करत नव्हतो. अंडी, ज्यूस घेत होतो. तिघांची मुले काळजी तर मुलांची आम्ही तिघे काळजी घेत घरात उपचार घेतला.तब्बल 20 दिवस घरातच क्वारंटाईन झालो. या काळात आम्ही कोरोनाला हरवले पण त्यात माझ्या मित्रांनी मला फोनवरून धीर दिला आधार दिला, मानसिक बळ दिले. त्यामुळे घरी रहा सुरक्षित रहा.