बेळगाव शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश : कालवे खुले झाल्याने शेतीला होणार फायदा
प्रतिनिधी /बेळगाव
किल्ला खंदकापासून जाणाऱया नाल्याचे पाणी अडून राहत होते. अनेक ठिकाणी हा नाला व नाल्याला असलेले कालवे बुजले होते. त्याची खोदाई करावी, अशी मागणी बेळगाव शेतकरी संघटनेने वारंवार केली होती. त्याची दखल घेऊन आमदार अनिल बेनके यांनी या कालव्यांच्या खोदाईला सुरुवात केली आहे.
किल्ला खंदकापासून जाणारे पाणी शिवारामध्ये शिरत होते. त्यामुळे जमीन खराब होत होती. याचबरोबर पिकेही खराब होत होती. या नाल्याचे पाणी शेतीला उपयोगाचे आहे. मात्र बऱयाचवेळा पुरामुळे आलेले पाणी शेतीला मारक ठरत होते. हे पाणी बळ्ळारी नाल्याला जाऊन मिळते. मात्र सर्व कालवे बंद झाल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी व त्यांच्या पदाधिकाऱयांनी पाठपुरावा केला. त्याची दखल आमदार अनिल बेनके यांनी घेतली. त्यानंतर महानगरपालिकेला या कालव्यांची खोदाई करण्याची सूचना करण्यात आली. मंगळवारी या कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी नारायण सावंत, सुनील जाधव यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. कालवे झाल्याने त्याचा फायदा शेतीला होणार आहे. त्याचबरोबर अधिक पावसामुळे होणारे नुकसानदेखील टळणार आहे. यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.