सहा महिन्यांपासून सहा वर्षाच्या बालकांचा सांभाळ करण्यासाठी संगोपन योजना
प्रतिनिधी/ बेळगाव
महिला सक्षमीकरणासाठी महिला बालकल्याण खात्याच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत नोकरी करणाऱया महिलांच्या मुलांचा सांभाळ करण्याची योजना देखील अंमलात आणली आहे. केंद्र शासनाच्यावतीने महिला व बालकल्याण खात्यांतर्गत ही योजना राबविण्यात येणार असून बेळगाव शहरात प्रथमच कॅन्टोमेंट बोर्डच्यावतीने केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.
महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात. 1 जानेवारी 2017 मध्ये ही योजना अंमलात आली होती. पण याची अंमलबजावणी झाली नाही. ‘राजीव गांधी राष्ट्रीय पेच स्किम’ या नावाने सरकारी सेवेत सेवा बजावणाऱया मातांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक क्षेsत्रात राखीवता ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात महिलांना प्राधान्य देण्यासाठी त्यांना भेडसावणाऱया समस्यांचे निवारण करण्यात येते. केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका योजनेची भर पडली आहे. महिलांना प्राधान्य देण्यात आल्याने प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने महिला महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.
केवळ ‘चूल आणि मूल’ ही संकल्पना आता मागे पडत आहे. ग्रामीण भागातील या योजना राबविण्यासाठी महिला बाल कल्याण खाते सतत कार्यरत असते. पण नोकरी सांभाळत असताना मुलांचे पालनपोषण करण्यास अडचणी निर्माण होतात. खासगी किंवा सरकारी क्षेत्रात काम करताना मुलांच्या संगोपनासाठी महिला वर्गाला नोकरीवर पाणी सोडावे लागते. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतातच, पण सरकारी सेवेत सुशिक्षित आणि चांगल्या हुद्यावर असलेल्या महिलांना आपले कौशल्य दाखविण्यास अडचणी निर्माण होतात. तसेच काहीवेळा कौटुंबिक आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी नोकरी सोडणे अशक्मय असते. अशावेळी नोकरी करत मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी महिला वर्गावर येते. कार्यालयीन कामकाजामुळे मुलांचे संगोपन व्यवस्थित करता येत नाही. अशा अनेक अडचणी नोकरी करणाऱया महिलांसमोर निर्माण होतात.
सरकारी क्षेत्रात काम करणाऱया महिलांसाठी योजना
नोकरी करणाऱया महिलांना मुलांचे संगोपन करण्यात सोयीचे जावे याकरिता महिला व बालकल्याण खात्याच्यावतीने मुलांचा सांभाळ करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. नोकरीच्या वेळेत आपली मुले सुरक्षित आणि व्यवस्थित रहावी याकरिता नोकरी करणाऱया महिलांसाठी शासनाच्यावतीने ही योजना राबविण्यात येणार आहे. प्रसूती झाल्यानंतर 6 महिन्यांचा कालावधी विश्रांतीकरिता सुटी देण्यात येते. पण त्यानंतर मुलांचा सांभाळ आणि नोकरी करताना महिला वर्गाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे सहा महिन्यांपासून सहा वर्षाच्या बालकांचा सांभाळ करण्यासाठी संगोपन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ही योजना केवळ सरकारी क्षेत्रात काम करणाऱया महिलांसाठी राबविण्यात येणार आहे. बेळगाव शहरात ही योजना राबविण्यासाठी कॅन्टोमेंट बोर्डने पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत संगोपन केंद्र स्थापन करण्यासाठी कॅन्टोमेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीबर्चस्वा यांनी प्रयत्न चालविले आहेत. एका केंद्रात 20 मुलांचा सांभाळ करता येवू शकतो. सकाळी नोकरीवर जाताना मुलांना सोडून जाणे तसेच सायंकाळी घरी जाताना मुलांना घेऊन जाणे बंधनकारक आहे. सदर केंद स्वसाहाय्य संघाच्यावतीने चालविण्यात येणार आहे. बेळगाव शहरात विविध सरकारी कार्यालयांमध्ये महिला नोकरी करतात. त्यांच्यासाठी ही योजना लाभदायक आहे.