पणजी प्रतिनिधी
केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मुरलीधरन यांची सोमवारी भेट घेऊन गोवा आणि देशातील इतर भागातील समुद्र तसेच जगातील विविध भागात अडकलेल्या खलाशांच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी मंत्र्यांनी नाईक यांना सर्व खलाशांना त्यांच्या घरी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी, परदेशातील सर्व दूतावासांना अडकलेल्या खलाशांना सर्वतोपरी मदत देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.