कोरोनापाठोपाठ शेतकऱयांवर अस्मानी संकट
आण्णाप्पा पाटील/ बहाद्दरवाडी
अन्न, वस्त्र व निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी अन्न पिकविणारा हा बळिराजा आहे. ऊन-पाऊस याची तमा न बाळगता तो वर्षभर शिवारात राबत असतो. दुष्काळ, अतिवृष्टी व योग्य हमीभाव या चक्रव्युहात शेतकरी नेहमीच सापडलेला असतो. शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱयासह अवकाळी पावसामुळे शिवारातील पिके जमीनदोस्त झाली असल्याने शेतकऱयांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे.
कोरोनाने साऱया जगात हाहाकार माजविला आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱयांनी पिकविलेला भाजीपाला शिवारात पडून आहे. काही शेतकरी एपीएमसी बाजारात भाजीपाला घेऊन जात आहेत. मात्र, सध्या भाजीपाला कवडीमोल दराने घेतला जात असल्याने शेतकऱयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
शुक्रवारी सायंकाळी तालुक्मयात जोरदार वादळी वाऱयासह अवकाळी पाऊस झाला. यात मिरची, बिन्स, दोडकी, कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
भाजीपाल्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने पीक उत्पादनासाठी केलेला खर्च निघणेही अवघड बनले आहे, असे काही शेतकऱयांनी सांगितले.
काही शेतकरी कोबीला दर मिळत नसल्याने चक्क पिकावर ट्रक्टर फिरवू लागले आहेत. सोनोली परिसरात कोबीच्या शेतात बकरी सोडण्यात येत आहेत. कृषीप्रधान देशात शेतकऱयांना पिकाला योग्य हमीभाव मिळवून देण्याच्या केवळ घोषणा, आश्वासनेच मिळतात. प्रत्यक्षात मात्र शेतकरी हतबलच झालेला पहावयास मिळतो आहे.
महापुरात सर्वच पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर रब्बीच्या हंगामात ढगाळ वातावरण व परतीच्या पावसाने कडधान्य पिके उद्ध्वस्त झाली. आता उन्हाळय़ात भाजीपाला पीक घेऊन उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडणाऱया शेतकऱयांवर कोरोना व अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. तालुक्मयात काजू व आंब्याच्या बागायती आहेत. या बागायतींवर बहुतांशी शेतकऱयांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. काजू-आंब्याच्या झाडांना बऱयापैकी फळधारणा झाली होती. मात्र, वादळी वाऱयामुळे आंबा व काजू झडून पडल्याने बागायतदार शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. शनिवारी सायंकाळीही पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱयांत आणखी चिंतेची भर पडली आहे.