कोणत्याही परिस्थितीत आम्ही क्रीडांगणाला जागा देणार नाही : सदस्यांची आक्रमक भूमिका, जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूर गावचा विस्तार वाढत चालला आहे. लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱयांनी पाळलेल्या जनावरांची संख्या देखील दुप्पटीने झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांसाठी गायरान जागा असणे महत्त्वाचे आहे. जर गायरान जागा नसेल तर जनावरे पाळायची कशी? तेंव्हा क्रीडांगणाचा तो प्रस्ताव तातडीने रद्द करा आणि 40 एकर जागा ही गावाला गायरान जागा म्हणून उपलब्ध करा, अशी जोरदार मागणी येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
शहरापासून केवळ 10 कि.मी.वर येळळूर गाव आहे. येळ्ळूर गावचा विस्तार हा वाढत चालला आहे. त्यामुळे गावासाठी राखीव जागा असणे महत्त्वाचे आहे. सध्या ग्राम पंचायत सर्व्हे क्रमांक 1140 मध्ये जी 40 एकर जागा आहे ती युवा सबलीकरण आणि क्रीडा खाते यांनी क्रीडांगण निर्माण करण्यासाठी ग्राम पंचायतकडे मागणी केली आहे. मात्र आम्ही पूर्वीपासूनच त्याला विरोध केला आहे. कारण गावाला गायरान जागा नसल्यामुळे भविष्यात कोणत्याही योजना किंवा शेतकऱयांसाठी गायरान जागा उपलब्ध राहणार नाही. तेंव्हा त्या जागेचा हट्ट प्रशासनाने सोडावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
गावची लोकसंख्या 18 हजारांपेक्षाही अधिक आहे. गावामध्ये 80 टक्क्मयांपेक्षही अधिक कुटुंबे शेतकरी आहेत. शेती कमी असली तरी शेतकरी जनावरे पाळून त्यावर आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे जनावरांना चरण्यासाठी गायरान जागा महत्त्वाची आहे. पशु खात्याच्या सर्व्हेनुसार गावामध्ये हजारो जनावरे आहेत. याचबरोबर इतर पाळीव प्राणीही आहेत. तेंव्हा त्याचा गांभीर्याने विचार करावा आणि होणारे स्टेडीयम रद्द करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
क्रीडांगण रद्द करा
येळ्ळूरची संपूर्ण जनताच या स्टेडीयमला विरोध करत आहे. त्याबाबत ग्राम पंचायतकडे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. याचबरोबर सर्व ग्राम पंचायत सदस्यांनीही त्याला विरोध दर्शविला आहे. तेंव्हा याचा पुनर्विचार करून हे स्टेडीयम रद्द करावे, असे या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, अरविंद पाटील, राजू डोण्याण्णावर, विलास बेडरे, पशराम परीट, राकेश परीट, जोतिबा चौगुले, सोनाली येळ्ळूरकर, राजकुंवर पावले, शांता काकतकर, शशिकांत धुळजी, कल्लाप्पा मेलगे, मनीषा घाडी, वनिता परीट, शालन पाटील, रुक्मिणी नाईक, राकेश परीट, रेणुका मेलगे, शांता मासेकर, सुवर्णा बिजगरकर, रुपा पुण्याण्णावर, पार्वती रजपूत, शिवाजी नांदुरकर, लक्ष्मी कणबरकर, प्रदीप सुतार, डॉ. तानाजी पावले, नारायण काकतकर, शिवाजी मानकोजी, उत्तम गोरल व ग्रामस्थ उपस्थित होते.