मुंबई
भारतातील खाद्यतेलाची आयात गेल्या सहा वर्षात सर्वात कमी यावर्षी नोंदली गेली असल्याची माहिती उद्योगातील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे. कोरोना महामारी आणि मागणीत पडलेला खंड या कारणामुळे खाद्यतेलाच्या आयातीमध्ये मोठय़ा प्रमाणात घट दिसून आली. खाद्यतेलाचा वापर वर्षाच्या तुलनेमध्ये 21 दशलक्ष टनाने कमी झाला आहे. ऑक्टोबर 31 ला संपणाऱया वर्षामध्ये खाद्यतेलाची आयातीची नोंद केली जाते. चालु आर्थिक 2020-21 वर्षामध्येही मागणी कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.