नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात गेल्या 24 तासात 30 हजार 773 कोरोनाचे रुग्ण आढळले. याचदरम्यान 38 हजार 945 लोक बरे झाले. तसेच दिवसभरात देशात 309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 3.34 कोटी लोकांना संसर्ग झाला आहे आणि 3.26 कोटी लोक बरे झाले आहेत. त्याचबरोबर 4.44 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. सध्या, सक्रिय प्रकरणांची संख्या 3.32 लाख आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 48 हजार 163 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एकंदर बाधितांपैकी 4 लाख 44 हजार 838 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच उपचारादरम्यान तब्बल 3 कोटी 26 लाख 71 हजार 167 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 3 लाख 32 हजार 158 इतके सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.