काँग्रेसला मतदान करण्याचे मतदारांना केले आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेसने ग्रामीण भागामध्ये शेवटच्या दिवशी गुरुवारी सायंकाळी 7 पर्यंत प्रचार केला. माजी मंत्री आणि आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्यासह इतर काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागामध्ये प्रचार केला आहे. मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
भाजपने सर्वांचीच दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. आजपर्यंत केवळ आश्वासनांची खैरात भाजपने केली आहे. एकही आश्वासन आजपर्यंत पूर्ण झाले नाही. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा आणि काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना मतदान करा, असे आवाहन करण्यात आले.
गुरुवारी विविध ठिकाणी कॉर्नर सभा तसेच घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यात आल्या. यावेळी काँग्रेसला विविध संघटनांनी आणि संघ-संस्थांनी पाठिंबा दर्शविला. आम्ही काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे असल्याचे सांगून मतदान करू, असे आश्वासन मतदारांनी यावेळी दिले. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, येळ्ळूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी या प्रचारामध्ये भाग घेतला होता.