अत्यावश्यक सेवा, शासकीय यंत्रणांना वगळले
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीलाही बसणार आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून 3 जून रोजी जिल्हय़ात एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी येथे दिली. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हावासीयांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसणार आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ालाही फटका बसण्याची शक्मयता नाकरता येत नाही. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 34 अन्वये जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी 3 जून रोजी नागरिकांना अत्यावश्यक सेवाविषयक बाबी वगळून अन्य कोणत्याही कारणासाठी जिल्हय़ातील एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी संचार करण्यास बंदी केली आहे. जिल्हय़ातील नागरिकांच्या जीवितास धोका होऊ नये व वित्त हानी होऊ नये, यासाठीच्या ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याने सदर आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.
जिल्हय़ात सर्वत्र संततधार
दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या जिल्हय़ात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून ठिकठिकाणी शेतीची कामे हाती घेण्यात आली आहेत. किनारपट्टी भागात चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने प्रशासनाने 4 जूनपर्यंत हाय अलर्ट जारी केला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान मंगळवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्हय़ात 27.25 मि. मी. च्या सरासरीने एकूण 218 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दोडामार्ग तालुक्मयात सर्वाधिक 59 मि. मी. पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी देवगड तालुक्मयात 11 मि. मी. पाऊस झाला आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. हा पाऊस मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासातील आहेत. कंसातील आकडे एकूण झालेल्या पावसाचे आहेत. दोडामार्ग 59 (85), सावंतवाडी 29 (54), वेंगुर्ले 16 (30.6), कुडाळ 31 (33), मालवण 32 (37), कणकवली 13 (30), देवगड 11 (16), वैभववाडी 27 (71), असा एकूण 27.25 (44.575).
अरुणा मध्यम प्रकल्प क्षेत्रात 37.60 मि. मी.
अरुणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 चोवीस तासात 37.60 मि. मी. पाऊस झाला आहे. देवघर प्रकल्प क्षेत्रात 25 मि. मी. आणि कोर्ले-सातंडी क्षेत्रात सात मि. मी. पाऊस झाला आहे.
जिल्हय़ातल्या मोठय़ा, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 217.0200 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून तिलारी प्रकल्प 48.51 टक्के भरलेला आहे.
मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा : देवघर – 26.7040, अरुणा – 18.4600, कोर्ले – सातंडी – 22.3200.
लघु पाटबंधारे प्रकल्पांतील साठा : शिवडाव – 1.0022, नाधवडे – 1.8346, ओटाव – 1.6605, देंदोनवाडी – 0.2307, तरंदळे – 0.8410, आडेली – 0.160, आंबोली – 0.2950, चोरगेवाडी – 0.6150, हातेरी – 0.2220, माडखोल – 0.9880, निळेली – 0.3190, ओरोस बुद्रुक – 0.4790, सनमटेंब – 0.4460, तळेवाडी – डिगस – 0.2220, दाभाचीवाडी – 0.5250, पावशी – 0.7240, शिरवल – 0.4400, पुळास – 0.1190, वाफोली – 0.0180, कारिवडे – 0.1160, धामापूर – 0.4710, हरकूळ – 0.4260, ओसरगाव – 0.0180, ओझरम – 0.4240, पोईप – 0.0, शिरगाव – 0.250, तिथवली – 0.3980, लोरे – 0.0560.