- सीईटीवरून आशिष शेलार यांची ठाकरे सरकारवर टीका
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र सरकारला दणका देत मुंबई हायकोर्टाने अकरावीची सीईटी परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारने सीईटी संदर्भात 28 मे रोजी एक अध्यादेश काढला होता. तो अध्यादेश हायकोर्टाने रद्द केला आहे. यानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. केल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे. या संदर्भात ट्विट करीत ’छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्’ अशा प्रकारची ही चंपी झालेय, अशी टीका केली आहे.
आशिष शेलार म्हणाले…
अकरावीची सीईटी रद्द करताना मा. उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा हा निर्णय अनियंत्रित, अवास्तव, कठोर, भेदभाव करणारा, लहरी आणि घटनेच्या समानतेच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे, अशा कठोर शब्दांत ठाकरे सरकारला फटकारले आहे. ‘छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्’ अशा प्रकारची ही चंपी झालेय, अशी टीका देखिल शेलार यांनी राज्य सरकार आणि शालेय शिक्षण मंत्रालयालावर केली आहे.
- ‘इयत्ता कंची ?’
पुढे ते म्हणाले, ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वारंवार आम्ही अनेक बाबी लक्षात आणून दिल्या. न्यायालयाने फटकारले. तरीही लहरी सरकार काहीही शिकलेच नाही. शिक्षणाचा हा अभूतपूर्व घोळ घालणाऱया आघाडी सरकारला आता विचारावेसे वाटते तुमची “इयत्ता कंची?’’, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.