@ प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून बेळगाव तालुक्मयासह परिसरात पडलेल्या दमदार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठय़ा प्रमाणात पाणी आले आहे. शहराला लागूनच असलेल्या कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीलाही मोठय़ा प्रमाणात पाणी आले असून या नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. नदी परिसरातील शिवारामध्ये पाणी शिरून काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे भात लागवड करणाऱया शेतकऱयांना चिंता लागून राहिली आहे.
मार्कंडेय नदी गेल्या काही वर्षांमध्ये अरुंद तसेच गाळामुळे खोली कमी होत चालली आहे. या नदीमधील पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. या नदीला अनेक गावांतील तसेच शहराचे पाणीही मिसळले जात आहे. राकसकोपपासून आलेल्या या नदीला विविध नाले मिळतात. त्यामुळे पावसाळय़ात या नदीचे पाणी पात्राबाहेर येत असते. यावषी पहिल्यांदाच नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे.
काही ठिकाणी शेतकऱयांनीही अतिक्रमण केले आहे. शहरातील डेनेजचे पाणी तसेच कचराही मोठय़ा प्रमाणात जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी हा कचरा अडकतो. त्यामुळे पाणी शेतशिवारात पसरत आहे. तेव्हा उन्हाळय़ातच या नदीची खोदाई होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मार्कंडेय नदीचा गाळ बऱयाच वर्षांपासून काढण्यात आला नाही. या नदीमध्ये झाडेझुडुपे तसेच जलपर्णी मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे अवघड आहे. ही नदी पुढे अरुंद होत गेली आहे. परिणामी नदी परिसरातील शेतीला फटका बसू लागला आहे.