प्रतिनिधी / पणजी :
कोरोनामुळे विदेशात अडकून पडलेले गोमंतकीय नागरिक व खलाशी यांना गोव्यात आणण्यासाठी दाबोळी विमानतळ खुला करावा, अशी मागणी गोवा सरकारने केंद्रीय गृह मंत्रालय व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे केली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
अन्य विमानतळ जसे खुले करण्यात आले त्याच पद्धतीने गोवा विमानतळही लवकरच सुरू व्हायला हवा. अन्य राज्यांना विमानतळ सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्याचपद्धतीने गोव्यालाही दाबोळी विमानतळ सुरू करण्यासाठी मान्यता मिळणार आहे. मात्र विमानांचे वेळापत्रक परराष्ट्र व्यावहार मंत्रालय निश्चित करणार आहे.
गोव्यातून आज शुक्रवार 8 रोजी पहिली रेल्वेगाडी मध्यप्रदेशसाठी रवाना होणार आहे. मात्र या गाडीची वेळ लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्याचबरोबर गोव्यातून कर्नाटकात गेलेल्या मजुरांना कर्नाटक सरकारने परत पाठविले आहे. कारण त्याच्यापाशी कर्नाटकचे नागरिक असल्याची कागदपत्रे उपलब्ध नाहीत. मात्र या प्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश अधिकाऱयांना दिल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.