लसीकरण, निर्बंधांमुळे देशातील संसर्ग नियंत्रणात -‘डब्ल्यूएचओ’च्या शास्त्रज्ञांचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार सुरू असतानाच जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारतातील संसर्गासंबंधी महत्त्वाचे भाष्य केले आहे. कोरोनासोबत जगणे भारतीयांच्या अंगवळणी पडत असून लसीकरण आणि निर्बंधामुळे संसर्ग नियंत्रणात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील एकूण लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक प्रमाणातील नागरिक विषाणूसह जगायला शिकल्याचा दावा त्यांनी केला.
सध्या भारतात कोरोनाचा स्थानिक स्तरावर प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाल्यामुळे कमी किंवा मध्यम पातळीच्या संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी दिसलेली बाधितांच्या संख्येतील प्रचंड वाढीची परिस्थिती सध्या दिसत नाही. भारताचे आकारमान आणि लोकसंख्येची विविधता आणि देशाच्या विविध भागांमध्ये रोगप्रतिकारशक्तीची स्थिती पाहता, ही परिस्थिती खूपच आटोक्यात आहे. तिसऱया लाटेवेळीही ही परिस्थिती नियंत्रणात राहिल्यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळू शकतात, असे मत त्यांनी पुढे व्यक्त केले. भारतातील काही राज्यात असलेली इम्युनिटी कमी तर काही भागात जास्त इम्युनिटी आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये देशाच्या विविध भागात कोरोनाची स्थिती अशीच वर-खाली राहण्याची शक्मयता आहे. ज्या भागात किंवा गटांना पूर्वी पहिल्या आणि दुसऱया लाटेत संसर्ग झालेला नाही. ज्या भागात फारसे लसीकरण झालेले नाही अशा ठिकाणी रुग्णवाढ उच्चांकी दिसेल, असेही त्यांनी पुढे सांगितले.
मुलांबाबतही अधिक काळजी नको!
मुलांमध्ये कोरोनाच्या प्रसारावर बोलताना पालकांनी घाबरण्याची गरज नाही. सेरो सर्वेक्षण आम्ही पाहत असून इतर आपण देशांकडून जे शिकलो त्यातून असे दिसते की मुलांना संसर्ग होण्याची शक्मयता असली तरी बहुतेक मुलांना सुदैवाने अतिशय सौम्य प्रकारचा संसर्ग होतो, असे स्वामीनाथन म्हणाल्या. देशात 70 टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य झाल्यानंतर देशात परिस्थिती सामान्य होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाचा सुपर व्हेरियंट पुढील वर्षी धडकणार
कोरोनाच्या आणखी एका नव्या ‘सुपर व्हेरियंट’चा प्रादुर्भाव पुढील वषी वाढणार असल्याची चिंता तज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही हा व्हेरियंट अधिक धोकादायक असून ज्यांचे अद्यापपर्यंत लसीकरण झालेले नाही, असे लोक याचे सुपर स्प्रेडर्स बनण्याची शक्मयता तज्ञांनी वर्तवली आहे. भारतात अद्यापही मुलांचे लसीकरण न झाल्यामुळे येत्या काळात हा वयोगट कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सुपर स्प्रेडर्स ठरू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. आता नव्याने येत असलेल्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव हा त्यापेक्षाही अधिक असण्याची शक्मयता असल्यामुळे येत्या काही वर्षात दोनपेक्षा अधिक लसी घ्याव्या लागतील का? यासंबंधीचे संशोधन केले जात आहे.