प्रतिनिधी / पणजी
मोटरवाहन कायद्याची अंमलबजावणी राज्यात 1 मे पासून सरकार करण्यात येणार आहे. मोटरवाहन कायद्याची अंमलबजावणी राज्यातील रस्ता अपघात कमी व्हावेत या हेतूने करत असला तरी राज्य सरकार निवडणूक निधी गोळा करण्यासाठी ही अंमलबजावणी करत असल्याचा आरोप शिवसेना गोवाचे प्रमुख जितेश कामत यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. कायद्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी वाहतूक नियम व साधनसुविधा चांगले असणे आवश्यक आहे. पणजी ते पेडणे या मार्गावर वाहतूकमंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि त्यानंतर वाहन कायदा अंमलात आणावा असे कामत यांनी सांगितले.
रस्ते खणले आहेत. साईनबोर्डस व्यवस्थितरित्या उपलब्ध करण्यात आले नाहीत. काही ठिकाणी ट्राफिक सिग्नल योग्यरित्या कार्यरत नाहीत. हे फक्त निवडणूकीच्या निधीसाठी धडपड करत आहेत. लोकांच्या आरोग्याबद्दल त्यांना काळजी नाही. रस्ते पहिल्यांदा हॉटमिक्स करा आणि नंतर कायदा आणा असे कामत यांनी सांगितले.