नवी दिल्ली
जूनला संपलेल्या तिमाहीत नेस्ले इंडियाने निव्वळ नफ्यामध्ये 11 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. विक्रीत वाढ व करांचा कमी बोजा यामुळे हा नफा कंपनीने कमावला असल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिल ते जूनपर्यंतच्या तिमाहीत नेस्ले इंडिया कंपनीने करपश्चात नफा 486 कोटी रुपयांचा मिळवला आहे. यापूर्वी मागच्या वषी याच कालावधीतला कंपनीचा नफा 437 कोटी रुपयांचा होता. या कालावधीत यंदा विक्री 1.96 टक्क्मयांनी वाढून ती 3 हजार 041 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेले तीन महिने कंपनीला अनिश्चितता आणि तणावाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी कधीच अशी परिस्थिती अनुभवायला मिळाली नसल्याचे कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन यांनी मत व्यक्त केले आहे.