प्रतिनिधी / आजरा
जम्मू -काश्मिर मधील उरी सेक्टरमध्ये घुसखोरी केलेल्या घुसखोरांना शोधून काढण्यासाठी भारतीय सैन्याकडून ऑपरेशन राबविण्यात येत होते. शुक्रवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास सीमेपालिकडून गोळीबार सुरु झाला. त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले.
मात्र या चकमकीत भारताचे चार जवान शहिद झाले असून, ऋषिकेश रामचंद्र जोंधळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात असलेल्या बहिरेवाडी गावचे निवासी होते. ते अवघ्या २० वर्षांचे होते. ऋषिकेश शहिद झाल्याची बातमी धडकताच बहिरेवाडीसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.