वार्ताहर/ खडकलाट
मागील वषी झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकलाटसह परिसरातील गळतगा, अकोळ, ममदापूर भागातील तंबाखू संपूर्णतः वाया गेला होता. मुसळधर पावसामुळे तंबाखू उत्पादनही कमी झाले होते. त्याच पद्धतीने यावषीही गेल्या आठ दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तंबाखू उत्पादनावर परिणाम होणार की काय?, या चिंतेत शेतकरी आहे. पावसामुळे शेतवाडीत पाणी साचून राहिल्याने काहींवर दुबार लावणी करण्याचे संकट ओढवले आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये परिसरात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकरी समाधनी होता. ऑगस्टमध्ये सर्वसाधारणपणे तंबाखूची लावण करण्यात येते. पण पावसामुळे सदर लावणी हंगाम पुढे ढकलण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवडय़ापासून ते शेवटच्या आठवडय़ापर्यंत पाऊस असतानाही अनेकांनी लावणी उरकल्या आहेत. मात्र सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱयांना फटका बसत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून खडकलाट परिसरात लहान-मोठय़ा पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे मात्र तंबाखू पिकामध्ये पाणी साचून राहिले आहे. या कारणाने तंबाखूला पाणी लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी शेतकरी चिंतेत आहेत. तंबाखू वाचवण्यासाठी डीएपी, युरिया व इतर खते देण्यात शेतकरी व्यग्र आहेत. आणखीन पाऊस पडल्यास शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.
खरीप पिकाला धोका
परिसरात मोठय़ा प्रमाणात सोयाबीन, भुईमूग, उडीद, मक्का व इतर पिके घेण्यात येत आहेत. सोयाबीन व भुईमूग काढणीला आले असताना गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे व्यत्यय येत आहे. सोयाबीन पीक उभे असले तरी पावसामुळे ते काढणे अशक्मय बनले आहे. यामुळे सोयाबीन आणि भुईमूग पावसामुळे वाया जाण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. तसेच उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. परिणामी खडकलाट परिसरात खरीप पिकाबरोबरच तंबाखू उत्पादक शेतकऱयांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.