अनेकांच्या घरात शिरले पाणी, झाडे कोसळून वाहनांचे नुकसान, बळीराजाही सापडला संकटात, बळ्ळारी नाला परिसराला पूर
प्रतिनिधी /बेळगाव
मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसाने साऱयांचीच दाणादाण उडविली आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून कोरोनानंतर जणू हे दुसरे संकटच कोसळले आहे. या पावसामुळे घरांची पडझड, वाहनांचे नुकसान, शेतीचे नुकसान झाले. तर अनेकांच्या घरात पाणी शिरुन साहित्याचे नुकसान झाले. ठिकठिकाणी झाडे पडून नुकसान झाले तर अनेक उपनगरांमध्ये पाणी शिरुन वाताहत झाली आहे. या पावसामुळे शहरातील आणि उपनगरांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच झालेल्या या दमदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे जनता चिंताग्रस्त झाली आहे.
या पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील जमिनीला तलावाचे स्वरुप निर्माण झाले आहे. येळ्ळूर रोड, यरमाळ रोड आणि धामणे रोड येथील शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. भात पिक पूर्ण कुजून जाणार असून शेतकरी हतबल झाला आहे. मंगळवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. बुधवारी काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली तर गुरुवारीही बऱयापैकी उघडीप होती. मात्र सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर झाला. त्याचबरोबर शुक्रवारीही सकाळपासूनच दमदार पाऊस झाला.
या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक गटारीं व नाल्यांचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. ते पाणी काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच परिसरातील नागरिकांना धडपड करावी लागली. शहरातील अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडून वाहतूक देखील विस्कळीत झाली. पहिल्याच पावसाने साऱयांची दाणादाण उडविली असून परिस्थिती गंभीर बनली आहे.
जेएनएमसी कॉलेज समोर झाडांची फांदी कोसळली
जेएनएमसी कॉलेजसमोर पार्किंग केलेल्या कारवर झाडाची मोठी फांदी कोसळून दोन कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवानेच यावेळी त्या परिसरात कोणीही नसल्याने जीवीत हानी झाली नाहे. मात्र या फांदीमुळे दोन कारचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्याच पावसात अशा प्रकारे झाडांच्या फांद्या कोसळून नुकसान झाले असल्याने जी धोकादायक झाडे आहेत तसेच झाडांच्या धोकादायक फांद्या आहेत त्या हटविण्याची मागणी होत आहे.
अन्नपूर्णेश्वरनगरात पुन्हा पाणी
वडगाव-येळ्ळूर रोडवरील अन्नपूर्णेश्वरनगर येथील नाल्याची खोदाई करण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी केएलईपासून बळ्ळारीपर्यंत नाल्याची खोदाई करण्यात आली. मात्र केएलईपासून आनंदनगरकडच्या नाल्याची खोदाईच करण्यात आली नाही. त्यामुळे त्या नाल्यातील पाणी निचरा होणे कठीण झाले आहे. आनंदनगर परिसरातील पाणी या नाल्यातून जात आहे. त्यामुळे नाल्याचा प्रवाह अधिक झाला आहे. त्याचा परिणाम अन्नपूर्णेश्वरनगर परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. कारण अनेकांच्या घरात पाणी शिरत आहे. या ठिकाणी धोकादायक विद्युत खांबही आहेत. त्याचीही दुरुस्ती करणे तसेच हटविणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून सांगण्यात आले.
संभाजीनगर-यरमाळ रोड परिसरातील घरांमध्ये शिरले पाणी
संभाजीनगर-यरमाळ रोड वडगाव येथील अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले. पाण्याला पुढे जाण्यासाठी वाट नसल्यामुळे हे पाणी शिरले. मात्र त्यामुळे घरातील नागरिकांना त्या ठिकाणी राहणेच अशक्मय झाले. याची माहिती युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे, बाळू जोशी, उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांना समजली. त्यानंतर त्या परिसरात जाऊन पाहणी केली. बसवराज हुलमनी यांच्या घरी पाणी शिरले होते. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन पाहणी करुन त्यांना जीवनावश्यक वस्तु दिल्या. त्याचबरोबर तात्पुरते पाणी काढून या कार्यकर्त्यांनी दिलासा दिला आहे.
शाहूनगर परिसरातही घरांत शिरले पाणी
शाहूनगर येथील जोशी कॉलनी येथे महापालिकेची मोठी खुली जागा आहे. त्या जागेमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी जमा झाले होते. पाण्याला पुढे जाण्यास वाट नसल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यानंतर काही जणांनी येथील ते पाणी काढण्याचा प्रयत्न केला. जेसीबीच्या सहकाय्याने चर काढुन पाणी काढल्याने येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आनंदनगर परिसरात अनेकांच्या घरात शिरले पाणी
आनंदनगर, तिसरा क्रॉसजवळ असलेल्या नाल्यावरच घरे बांधण्यात आली आहेत. नाला अरुंद झालेला असल्यामुळे पाणी पुढे जाणे कठीण झाले आहे. शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे आनंदनगर-तिसरा क्रॉस येथील अनेकांच्या घरात पाणी शिरले. पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. तिसऱया क्रॉसमधील गल्लीमध्ये गुडघाभर पाणी साचून होते. वडगाव ते अनगोळला जाणाऱया रस्त्याचे रुंदीकरण करुन त्याचे डांबरीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी अतिक्रमण हटविण्यात आले आहे. मात्र या नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळेच हा फटका बसला असून तातडीने या नाल्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
मार्कंडेय नदीत वृद्ध वाहून गेला : काकतीजवळील घटना : आज पुन्हा शोधमोहीम सुरू करणार
काकतीजवळ मार्कंडेय नदीत एक शेतकरी वृद्ध वाहून गेला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली असून रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
सिद्राई दोड्डरामा सुतगट्टी (वय 65, रा. काकती) असे त्या वृद्धाचे नाव आहे. मार्कंडेय नदीला पाण्याचा प्रवाह वाढला आहे. शुक्रवारी दुपारी हा वृद्ध नदीत वाहून गेला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, तहसीलदार आर. के. कुलकर्णी आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. नदीपात्रात वाहून गेलेल्या सिद्राई दोड्डरामा सुतगट्टी यांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अंधारामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली. शनिवारी सकाळी पुन्हा मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर व त्यांच्या सहकाऱयांनी वृद्धाला शोधण्यासाठी प्रयत्न केले.