श्रीपाद नाईक यांचे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
केंद्रीयमंत्री निर्मला सितारामन यांनी काही दिवसापूर्वीच सादर केलेल्या अर्थसंकल्पात गोव्याला केंद्रसरकारकडून मिळाणाऱया अनुदानात मोठी वाढ केली असल्याने गोव्यातील विकास कामांना अणखीन वेग मिळणार आहे. 2022-23 या वर्षासाठी राज्याला मिळणाऱया अनुदानात 3152 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. असे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. गोव्यात डबल इंजिनचे सरकार असल्याने मागील वर्षाच्या तूलनेत यावर्षी मिळणाऱया अनुदानामध्ये सुमारे 7 टक्क्यांनी वाढ केली. गोव्याला पुन्हा डबल इंजिनचे सरकार द्या असेही श्रीपाद नाईक म्हणाले.
पणजी येथे भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रीपाद नाईक बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत गोवा प्रभारी सी.टी. रवी उपस्थित होते. सर्व गोष्टींचा व्यवस्थित ताळमेळ राखून, सर्वसामान्य लोकांचे हित जपून सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताचा अर्थसंकल्प असेच म्हणावे लागेल असही नाईक म्हणाले. देशातील इतर राज्यातील तूलनेत गोव्याची प्रगती जलद गतीने होत आहे. दरडाही उत्पनातही बऱयाप्रमाणात वाढ झालेली आहे. डबल इंजिन सरकारमुळेच हे सर्व शक्य होत असल्याचे नाईक म्हणाले. राज्यातील अनेक उद्योजकांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले असल्याचेही नाईक यांनी सांगितले.
गोव्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. गोव्याच्या प्रगतीत आणखन वाढ होण्यासाठी जनतेने पुन्हा एकदा भाजपाला कौल द्यावा असे आवाहन नाईक यांनी केले. निवडणूका जवळ आल्या की अनेक नवनवी राजकीय पक्ष येत असतात. पूर्ण न करू शकणाऱया पोकळ आश्वासने देत असतात गोव्यातही सध्या तोच प्रकार सुरु आहे. विविध राजकीय पक्ष सध्या स्थितीत त्यांच्याकडे एकही आमदार नसतानाही अनेक आश्वासने देत आहेत. अनेक गोष्टी मोफत देण्याचीही वल्गना करीत आहेत. गोव्यातील जनता सुज्ञ असून त्यांच्या पोकळ आश्वासनांना बळी पडणार नाही असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. गोव्याच्या भरभराटीसाठी गोव्यात डबल इंजिन सरकार येणे काळाची गरज असून जनतेने ते अगोदरच ठरविले आहे. येणाऱया निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमताने निवडून येईल यात शंकाचन नाही असेही श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
गोव्यात काँग्रेसचे सरकार आल्यास पेट्रोल दर कमी करू असे राहूल गांधी यांनी सांगितले आहे त्याबाबत विचारले असता सी. टी. रवी म्हणाले की ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे त्या ठिकाणी राहूल गांधीनी अगोदर पेट्रोलचे दर कमी करावे आणि नंतर गोमंतकीयांना खोटी आमीषे दाखवावी. ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे त्यांच्या तुलनेत गोव्यात पेट्रोलचे दर खूप कमी आहेत असेही सी.टी. रवी म्हणाले.
टीएमसी आप हे काँग्रेसची बी टीम आहे. केवळ भाजपला हरविणे हा एकच त्यांचा मुद्दा आहे. एकही पक्षाला सत्तेवर येण्याचा आत्मविश्वास नाही. आजच्या घडीला तरी केवळ भाजपच पुन्हा स्वबळावर सत्ता स्थापन करणार असे आत्माश्वासाने सांगू शकतो कारण भाजपने आपल्या कार्यकाळात जनतेसाठी काम केले आहे आणि जनतेची सेवा केली आहे. स्वप्ने कुणीही पाहू शकतो, ती सत्यात उतरविण्यासाठी अगोदर जनतेची सेवा करणे गरजेचे असते. केवळ निवडणूका जवळ आल्याची आश्वासनांची आमीषे दाखविली म्हणून स्वाप्ने साकार होत नाही असेही सी.टी. रवी म्हणाले. भाजपाचा प्रचार जोरात सुरु असून येत्या काही दिवसात भाजपचे स्टार प्रचारक गोव्यात दाखल होणार आहेत. त्यात नितीन गडकरी, राजनाथ सिंग, अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य काही नेते गोव्यात येतील असेही रवी म्हणाले.