प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊनच्या काळात शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले, त्यांच्या शेती मालाबरोबरच दूधा सारख्या नाशवंत पदार्थाचे आतोनात नुकसान झाले. सध्या पेट्रोल दर हा 100 रूपये प्रति लिटर इतका झाला आहे. तरी देखिल नागरिक रांगेत उभारून पेट्रोलची खरेदी ही करतातच. तर मग दूध दरवाढ का नको? असा सवाल शेतकरी वर्गाकडुन करण्यात येत आहे.
सध्या जिल्हय़ात विविध ठिकाणी विविध किंमतीने दूध विक्री केली जाते. त्यामुळे या दूधाच्या विक्रीला योग्य तो हमीभाव हा मिळाला पाहिजे जेणे करून शेतकरी वर्गांचे आर्थीक धोरण देखिल काही प्रमाणात सुधारेल. कारण शेतकरी वर्गाने पिकविलेल्या मालाची विक्री करून त्यांना वर्षातुन एकदाच काय ती मुद्दल मिळते. दूध हे एकमेव माध्यम आहे, की जेणे करून शेतकरी वर्गांना नियमित रक्कम मिळत असते.
पण सध्या दूध विक्रीचा दर शेतकरी वर्गांना न परवडणारा आहे, कारण जनावरांना लागणाऱया पेंडीची, खुराकची किंमतच 12 शे रूपयापर्यंत आहे. तसेच जणावरांच्या देखभाली करीता देखिल तितकाच खर्च व वेळ लागतो. त्यामुळे याची दखल घेत दूध दरवाढ देखिल करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
दूध दरवाढ झालीच पाहीजे
सध्या दूधाचा धंदा हा न परवडणारा आहे, त्यामुळे शेतकऱयांचा आर्थिक दर्जा उंचवायचा असेल तर दूध दरवाढ ही झालीच पाहिजे. पेट्रोलचा दर जर 100 रूपये झाला आहे, तर दूध दरवाढीला विरोध का?