कोरोनाच्या संकटामुळे अर्धवट राहिलेल्या प्रकल्पांचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सरकारने 6 महिन्यांचा अतिरीक्त कालावधी वाढवून देण्याचे निश्चित केले आहे. ज्यांचे प्रकल्प पूर्णत्वाकडे आले होते त्यांना पुढच्या सहा महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण करता येणार आहे.
कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले असून सध्याला कामगारांचा अभाव जाणवतो आहे. परिणामी बांधकाम प्रकल्पांचे काम थांबले आहे. याची दखल घेऊन सरकारने बांधकाम प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी सहा महिने वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अर्धवट स्थितीतील पण पूर्णत्वाकडे आलेल्या बांधकाम प्रकल्पांना दिलासा मिळणार आहे. त्यांना बांधकाम पूर्ण करण्याची घाई करावी लागणार नाही.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंबंधातला निर्णय घेताना बांधकाम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा महिने जादा कालावधी वाढवून दिला आहे. रेरा कायद्यानुसार कोरोना महामारी हे दैवी संकट मानले आहे. मनुष्याच्या हाताबाहेरचं संकट असल्याचे मानण्यात येत आहे. बिल्डरांना त्यांच्या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी सहा महिने वाढवून देण्यात आले आहेत. ज्या प्रकल्पांचे बांधकाम 25 मार्च वा त्यानंतर पूर्ण होणार होते त्यांना आपल्या प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिने वाढीव कालावधी मिळणार आहे. 25 मार्चपासून लॉकडाऊनमुळे या व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोणत्याही हालचाली या कालावधीत या क्षेत्रात चालल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पांना उशीर होणे साहजिक होते. या साऱया परिस्थितीची जाणीव ठेवूनच अर्थमंत्र्यांनी बांधकाम पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा वाढवून दिली. अर्थातच बिल्डरांनी याचे स्वागत केले आहे. त्यांना आता आपल्या प्रकल्पांचे काम हाती घेऊन 6 महिन्यापर्यंत पूर्ण करणे शक्य होणार आहे.