बुधवारी साताऱयात साई व तिचे वडील आशिष पाटील यांचे जल्लोषात स्वागत
प्रतिनिधी/ सातारा
एखादा दूरचा प्रवास करावयाचा असल्यास प्रत्येकजण आपल्याला सोईस्कर अशा वाहनांचा आधार घेतो. त्यातच काही ठराविक वयोगटातील युवक युवती, नागरिक हे विविध संदेश देत रॅली किंवा फेरी विविध वाहनाचा वापर करून काढतात. अशातच साई पाटील या केवळ 10 वयोगटातील मुलीने काश्मिर ते कन्याकुमारी 4 हजार किलो मिटर असा देशभ्रमणचा प्रवास सायकलीने आपले वडील आशिष पाटील यांच्या सोबत सुरू केला आहे. त्यांचे बुधवारी साताऱयात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मुळचे बाळकुंभ जिल्हा ठाणे येथील रहिवासी असलेल्या सई व तिच्या वडिलांनी दि. 14 डिसेंबरपासुन वैष्णवदेवीच्या चरणी प्रार्थना करून काश्मिर मे कन्याकुमारी पर्यंतच्या या सायकल राईडला त्यांनी सुरूवात केली आहे. या फेरी अंतर्गत ते ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ असा संदेश देतात. बुधवारी 22 शे किलोमिटरचा प्रवास पुर्ण करून 23 व्या दिवशी ही चिमुरडी आपल्या वडिलांसमवेत राजधानी साताऱयात दाखल झाली.
यावेळी लायन्स क्लब ऑफ सातारा, सातारा रायडर्स ग्रुप यांचा वतीने शिवतीर्थ पोवाईनाका येथे त्यांचा सातारकरांच्या वतीने शानदार स्वागत करण्यात आले. शिवछत्रपतींचे शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या बाप लेकीच्या जोडीने सातारा शहरातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संदेश देत पुढील प्रवासाला सुरूवात केली. इतक्या लहान वयात सईने सुरू केलेल्या देशभ्रमणचा सायकलवरून राईड करत असल्याचे पाहुन सर्वांचेच डोळे उंचावत होते.
यापुर्वी त्यांनी जम्मु काश्मिर, पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र असा प्रवास केला आहे. या राईड अंतर्गत मुलींच्या शिक्षणा बरोबरच, झाडे लावा झाडे वाचवा, इंधनाची बचत करा आदी संदेश देत आहेत. राजधानी साताऱयात दाखल होऊन आम्हाला खुप आनंद झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सातारकरांनी केलेल्या जंगी स्वागताबद्दल ही त्यांनी आभार व्यक्त केले.