पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱयांचे आंदोलन : मनपा आयुक्तांकडून कारवाईचे आश्वासन; आंदोलन मागे
प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी शेतवडीतील पिके बसवणकोळ्ळ व परिसरातील भटकी जनावरे फस्त करत असल्याने शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. या भटक्मया जनावरांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी कणबर्गी गावच्या प्रवेशद्वारावर बैलगाडय़ा, ट्रक्टर आणि जनावरांसह ठिय्या आंदोलन केले. आंदोलन ठिकाणी महापालिका आयुक्तांनी भेट देऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
भातकापणी झाल्यानंतर कणबर्गी गावातील ग्रामस्थ कडधान्य पेरणी करतात. मका, ज्वारी, हरभरा, मसूर, वाटाणे अशी पिके घेण्यात येतात. मात्र दरवषी ही पिके भटकी जनावरे फस्त करत आहेत. जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा निवेदने देण्यात आली होती. काही शेतकऱयांनी भटक्मया जनावरांना बांधून ठेवले होते. मात्र सदर जनावर मालकांनी शेतकऱयांवरच चोरीचा आरोप घातला. त्यामुळे शेतकऱयांनी जनावरांच्या विरोधात कोणतीच कारवाई केली नाही. परिणामी जनावरांचा उपद्रव वाढला आहे.
रात्रीच्यावेळी सदर जनावरे सोडण्यात येत आहेत. त्यामुळे संपूर्ण पिके नष्ट होत आहेत. शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याने रविवारी बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने बुधवारी सकाळी गावच्या प्रवेशद्वारावर बैलगाडय़ा व जनावरांसह आंदोलन छेडून रास्तारोको केला.
शेतकऱयांच्या पिकांचे नुकसान करणाऱया भटक्मया जनावरांचा बंदोबस्त करा, अशी मागणी करण्यात आली. याबाबत कारवाई न केल्यास मुख्य रस्त्यावर आंदोलन छेडून रास्तारोको करू, असा इशारा देण्यात आला. आंदोलनस्थळी मनपा आयुक्त जगदीश के. एच. व माळमारुती पोलीस स्थानकाचे अधिकारी दाखल झाले.