जीवाणूतज्ञ डॉ. टी. के. जेकब जॉन यांचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात आताच्या स्थितीत कोरोनाव्हायरसची तिसरी लाट येण्याची शक्मयता फारच कमी असल्याचा दावा ज्ये÷ जीवाणूतज्ञ आणि आयसीएमआरच्या सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड रिसर्च इन व्हायरॉलॉजीचे माजी प्रमुख डॉ. टी. जेकब जॉन यांनी केला आहे. संशोधनातून यासंबंधीचे संकेत मिळत असून या अभ्यासाचे निष्कर्ष लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले. अनेक साथरोग तसेच जीवाणूतज्ञांच्या मते देशातील 86 टक्के नागरिकांमध्ये असलेले अँटिबॉडीजचे प्रमाण हर्ड इम्युनिटी किंवा सामूहिक प्रतिकारक्षमता तयार होण्यासाठी पुरेसे आहे. अगदी डेल्टा व्हेरियंटसारख्या वेगाने पसरणाऱया विषाणूला थोपवण्यासाठी हे प्रमाण उपयुक्त आहे, असा दावाही व्यक्त केला जात आहे.