ऑनलाईन टीम / लडाख :
मागील काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये तणाव वाढलेला आहे. दोन्ही देशांचे जवान आमने सामने आहेत. ही नाजूक परिस्थिती लक्षात घेत भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे परिस्थीचा आढावा घेण्यासाठी लडाखमध्ये पोहोचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या दौऱ्यात लष्करप्रमुख सीमेवर तैनात अधिकाऱ्यांशी रणनीतीवर चर्चा करू शकतात. उल्लेखनीय म्हणजे, भारत आणि चीन दरम्यान सैन्य संवादानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. अनेक भागांत दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या फायरिंग रेंजमध्ये आहेत.
दरम्यान, पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावर सर्वाधिक तणाव आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री अचानक या भागात घुसखोरी करुन एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने त्यांचा डाव उधळून लावला.